शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हजारोंची तृष्णा भागवितो मोंढ्यातील पाण्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:44 IST

जुन्या मोंढ्यातून वजिराबादकडे निघताना भर उन्हातही कॉर्नरला तुडुंब गर्दी दिसून येते. ही गर्दी असते जारचे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी. भल्या पहाटे प्रारंभ झालेला हा उपक्रम सायंकाळपर्यंत अविरतपणे सुरू असतो. दिवसभरात अक्षरश: हजारो नागरिक या मोफत उपक्रमाचा लाभ घेतात.

ठळक मुद्देअब्दुल सलीम कादरी सौदागर यांचा उपक्रमदररोज हजारो नागरिकांना जारचे पाणी

विशाल सोनटक्के ।नांदेड : जुन्या मोंढ्यातून वजिराबादकडे निघताना भर उन्हातही कॉर्नरला तुडुंब गर्दी दिसून येते. ही गर्दी असते जारचे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी. भल्या पहाटे प्रारंभ झालेला हा उपक्रम सायंकाळपर्यंत अविरतपणे सुरू असतो. दिवसभरात अक्षरश: हजारो नागरिक या मोफत उपक्रमाचा लाभ घेतात.मोंढा परिसरातील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथे खरेदीसाठी केवळ शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या विविध भागांतून राबता असतो. या भागात खरेदीसाठी फिरणारे अनेकजण घसा कोरडा पडताच मोंढ्याच्या कॉर्नरकडे वळतात. तेथे शुद्ध आणि थंड पाण्यांच्या जारचा ढीगच लागलेला असतो. व्यापारी अब्दुल सलीम कादरी सौदागर हे हा उपक्रम राबवितात. कादरी यांच्या या पाणपोईवर आठ ते दहा मुले कार्यरत असतात. येणाऱ्या- जाणाºया पादचाऱ्यांना ते आवर्जून पाणी हवे का? अशी विचारणाही करतात. पाणपोईवर गेल्यानंतर तितक्याच विनम्रतेने थंड पाण्याचा ग्लास हातात ठेवला जातो. विशेष म्हणजे, येणाºया- जाणाºया नागरिकांनी तेथे आपल्या जवळच्या बाटल्या पाण्याने भरुन मागितल्यास त्या बाटल्याही आवर्जून भरुन दिल्या जातात. कादरी यांचा हा उपक्रम सकाळी सुरू होतो तो दिवस मावळेपर्यंत चालू असतो. या कालावधीत हजारो जणांची तृष्णा भागते.पाण्यासारखे पुण्य नाहीभर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झालेले नागरिक पाहिल्यानंतर दिवसभर सुरू राहणारी पाणपोई सुरू करण्याचा निर्धार केला.तहानलेल्यांना पाणी देणे यासारखे दुसरे पुण्य नाही,अशी यामागची भावना होती. या उपक्रमाचा दररोज ४० हजारांहून अधिक नागरिक लाभ घेतात. मागील सात-आठ वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. याचे सर्वस्तरातून कौतुक होत असले तरी प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे अब्दुल सलीम कादरी सौदागर यांनी सांगितले.लागेल तेवढे जार उपलब्धपाणपोई सकाळी सुरू झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी येथे नागरिकांची रीघ लागलेली असते. त्यामुळे दिवसभरात शेकडो पाण्याच्या जारची गरज भासते. अब्दुल कादरी यांनी हे लक्षात घेवून त्याची विशेष व्यवस्था केली आहे. जसजसे जार संपतात तसतसे नव्याने जार आणून उपलब्ध करुन दिले जातात. यासाठी माणसांची नियुक्तीच केली आहे. त्यामुळे दिवसभर येथे पाणी उपलब्ध असते.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूक