शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यात शालेय विद्यार्थिनी सायकलींपासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:52 IST

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाच कि़मी़ लांब अंतरावरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी मोफत सायकली दिल्या जात होत्या़ आता या योजनेचा संबंधित विभागाला विसर पडलेला दिसतो़ पाच वर्षांपासून तालुक्यात एकही सायकल मुलींना मिळाली नाही़

ठळक मुद्देमहिला, बालकल्याण विभागाला विसर ; ५ वर्षांपासून एकाही सायकलीचे वितरण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पाच कि़मी़ लांब अंतरावरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी मोफत सायकली दिल्या जात होत्या़ आता या योजनेचा संबंधित विभागाला विसर पडलेला दिसतो़ पाच वर्षांपासून तालुक्यात एकही सायकल मुलींना मिळाली नाही़एक मुलगी शाळा शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, असे म्हणतात़ ‘अडाणी आई घर वाया जाई’ असा नाराही याच मुलींच्या तोंडून गावागावांत १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला ऐकायला मिळतो़ परंतु या मुलींना शाळेत पाठविताना काय काय अडचणी असतात, याचा धसका पालकांनाच माहीत असतो़ ज्या गावांत शाळा आहेत, तेथील मुली शिकतात़ परंतु, अनेक गावांना पाचवीपर्यंत शाळा असतात़ पुढील शिक्षणासाठी त्यांना लगतच्या मोठ्या गावात जावे लागते़ कुठे वाहनाची सोय असते तर कुठे नसते़ एकूण १९६ शाळांपैकी १५ ते २० गावांत १० वी, १२ वी पर्यंत शाळा आहेत़ उर्वरित १७० गावांतील विद्यार्थी सोयीनुसार आजूबाजूच्या गावात शिक्षण घेतात़रस्त्यावरील गावे सोडली तर १०० गावांतील विद्यार्थ्यांना बससेवाही नाही़ विद्यार्थिनींना मोफत पास आहे. परंतु, गावातून बसच नाही़ तर पासचे करायचे काय? खाजगी वाहनांत कोंबडे कोंबल्याप्रमाणे मुली प्रवास करताना शिक्षक, पालक पाहतात़ वरवट, गायतोंड, जगापूर, शिबदरा, माळझरा, कार्ला, मनाठा, सावरगाव येथील विद्यार्थिनींना मनाठा पाटीला जावे लागते़ वरवट-गायतोंड येथील मुली मात्र पायीच येतात़---पायीशिवाय पर्याय नाहीवाकीच्या मुली आठ कि़मी़ पायी येतात़ तरोडा, चोरंबा, ठाकरवाडी येथील मुलींना पायी चालण्याशिवाय पर्याय नाही़ गावात रिक्षा नसेल तरी त्यांच्या वेळेत तो येत नाही.रिक्षाला जादा भाडेरिक्षाला जादा भाडे देवून जावे लागते़ या मुलींना महिला बालकल्याण विभागाकडून सायकल उपलब्ध करून दिल्यास त्यांची शाळेची वाट सुखकर होईल़--हदगाव तालुक्यात सहा जि. प. गटअंबाळा, हडसणी, हारडप, ल्याहरी, वरवट, मनाठा, गायतोंड, माळझरा, मार्लेगाव, उंचाडा, करमोडी याशिवाय तामसा परिसरातील तळेगाव, पाथरड, शिवपुरी, रावणगाव, उमरी, वडगाव यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल़ तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट आहेत.

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थी