शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गुरु रविदासांचा संघर्ष विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता - पद्‌माकर बाबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:17 IST

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य ...

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य व विज्ञानवाद सांगितला. जात अथवा वर्णव्यवस्था ही निसर्गनिर्मित नसून, मानवनिर्मित आहे, तिचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी मानवनिर्मित जातीव्यवस्था व जातीव्यवस्थेला बळ देणाऱ्या मानवा-मानवात उच्च-निचतेचा विचार निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांना नाकारून जातीअंताची लढाई लढली. मुळात गुरू रविदासांचा संघर्ष हा विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता, असे मत इंजि. पद्‌माकर बाबरे यांनी व्यक्त केले.

कांशी-माया प्रबोधन मंच, नांदेडच्यावतीने आयोजित गुरू रविदास यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीएफचे अध्यक्ष मनोजकुमार वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेम पाटील बोकारे, गजानन पाटनूरकर, संगम वाघमारे टेलर उपस्थित होते.

बाबरे म्हणाले की, आज देशात गुरू रविदासांच्या विचारांची खरी गरज आहे. रविदास कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्त्वाचे नाही, ते महामानव होते त्यांची जयंती प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी साजरी करून एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुरू रविदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी बहुजन समाजाला एकत्र करून कांशीरामजी जयंतीपासून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मनोजकुमार वाघमारे यांनी गुरू रविदासांचे कार्य सविस्तर सांगून त्यांच्या जीवनकार्याचा इतिहास पाच केडर कॅम्प घेऊन राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवराज कांबळे, उमाजीअण्णा रेड्डी यांनी विचार मांडले.

प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन शेख जावेद यांनी केले तर शिवाजी सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिगंबर वाघमारे, गंगाधर सर्जे, करण बनसोडे, बालाजी टोम्पे, कृष्णा टोम्पे, चांदोजी हराळे, उत्तम टोम्पे आदींनी परिश्रम घेतले.