शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मोठा दिलासा; गावठाणापासून २०० मीटरमधील जमिनीला आता ‘एनए’ची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:56 IST

एनए परवानगी मिळविणे हे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरील बनले आहे.

नांदेड : गावठाणापासून २०० मीटरच्या आत समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना आता बिनशेती परवानगीची अर्थात एनएची गरज राहणार नाही. शासनाने १३ एप्रिल २०२२ राेजी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे अशा जमीन मालकांना माेठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत गावठाण मर्यादेला अगदी लागून असलेल्या शेतीत ढाबा, हाॅटेल टाकायचे असेल, पेट्राेल पंप उभारायचा असेल, तर ती जमीन अकृषक (एनए) करणे बंधनकारक हाेते. प्रत्यक्षात एनएची ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. त्यासाठी १० ते १२ वेगवेगळ्या विभागांच्या एनओसी लागतात. त्यासाठी माेठा खर्चही होताे. त्यानंतरही एनएची परवानगी दंडाधिकाऱ्यांकडून मिळेलच याची हमी नाही.एनए परवानगी मिळविणे हे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरील बनले आहे.

उपविभागीय महसूल अधिकाऱ्याकडे एनएचे अनेक प्रस्ताव दाखल हाेतात. मात्र एखाद्याच मास्टर अथवा वजनदार माणसाचा प्रस्ताव मंजूर हाेताे. सामान्यांचे प्रस्ताव वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून राहतात. त्यामुळे जमीन मालकाला आपलीच जमीन व्यवसायासाठी वापरता येत नाही. तुकडे बंदीतील ही अडचण शासनाने ओळखली. त्यामुळेच गावठाण मर्यादेच्या २०० मीटर परिसरातील जमिनीला आता एनएची गरज राहणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबत महसूल अधिकारी यांनी प्रत्येक १५ दिवसांनी स्वत: तपासणी करून आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबतचा अहवाल नियमित जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. यासंबंधी सनद देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग