शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या 'संकल्प यात्रे'ला अर्धापूरात ब्रेक; ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रम गुंडाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:26 IST

पोलिसांचा ताफा दाखल झाला मात्र एकही ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात भारत संकल्प रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज आणि इतर ग्रामस्थांनी "भारत सरकारचा कार्यक्रम की मोदी सरकारचा कार्यक्रम" असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांनी संकल्प यात्रा लागलीच गुंडाळली. 

शासकीय योजनांची माहिती संवादासाठी महाराष्ट्रात गुरुवार दि.१६ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ च्या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सदर यात्रा देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील गावोगावी राबविण्यात येत आहे. तर नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली.

अर्धापूर तालुक्यात दि.२३ नोव्हेंबर रोजी आज पहिल्याच दिवशी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपळगाव महादेव येथे आला. मात्र, येथील ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये असा पवित्रा घेतला होता. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम नको, आमच्या जखमेवर मीठ न टाकता, आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.

पोलिसांचा ताफा दाखल, प्रशासनाने कार्यक्रम गुंडाळलाराशन कार्ड, घरकुल, मनेरगा अंतर्गत विहीर, शेततळे आदी योजना अर्धापूर तहसील व पंचायत समितीने प्रभावी पणे राबवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नुसती कार्यक्रमातून चमकोगीरी नको असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या पोलीस पथकाने कडक बंदोबस्त दिल्याने सदर कार्यक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण या कार्यक्रमास गावातील एकही नागरीक उपस्थित राहीला नसल्याने प्रशासनाने काढता पाय घेत सदर कार्यक्रम गुंडाळला.

अनेक दिवसांपासून पिंपळगाव म. सक्रिय...मराठा समाजाच्या मागणीसाठी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण, आमरण उपोषण, सामुहिक मुंडण, असंख्य महिला पुरुष मराठा समाज बांधवांचा सामुहिक जेलभरो आदी लक्षवेधी आंदोलने करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदी