शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

शासनाच्या 'संकल्प यात्रे'ला अर्धापूरात ब्रेक; ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रम गुंडाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:26 IST

पोलिसांचा ताफा दाखल झाला मात्र एकही ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात भारत संकल्प रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज आणि इतर ग्रामस्थांनी "भारत सरकारचा कार्यक्रम की मोदी सरकारचा कार्यक्रम" असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांनी संकल्प यात्रा लागलीच गुंडाळली. 

शासकीय योजनांची माहिती संवादासाठी महाराष्ट्रात गुरुवार दि.१६ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ च्या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सदर यात्रा देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील गावोगावी राबविण्यात येत आहे. तर नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली.

अर्धापूर तालुक्यात दि.२३ नोव्हेंबर रोजी आज पहिल्याच दिवशी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपळगाव महादेव येथे आला. मात्र, येथील ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये असा पवित्रा घेतला होता. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम नको, आमच्या जखमेवर मीठ न टाकता, आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.

पोलिसांचा ताफा दाखल, प्रशासनाने कार्यक्रम गुंडाळलाराशन कार्ड, घरकुल, मनेरगा अंतर्गत विहीर, शेततळे आदी योजना अर्धापूर तहसील व पंचायत समितीने प्रभावी पणे राबवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नुसती कार्यक्रमातून चमकोगीरी नको असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या पोलीस पथकाने कडक बंदोबस्त दिल्याने सदर कार्यक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण या कार्यक्रमास गावातील एकही नागरीक उपस्थित राहीला नसल्याने प्रशासनाने काढता पाय घेत सदर कार्यक्रम गुंडाळला.

अनेक दिवसांपासून पिंपळगाव म. सक्रिय...मराठा समाजाच्या मागणीसाठी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण, आमरण उपोषण, सामुहिक मुंडण, असंख्य महिला पुरुष मराठा समाज बांधवांचा सामुहिक जेलभरो आदी लक्षवेधी आंदोलने करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदी