शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात किती उद्योग बंद पडले हे सरकारने घोषीत करावे- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 13:47 IST

पोटाला लागणारे अन्न पिकवणारा शेतकरी का दुर्लक्षीत

ठळक मुद्देराज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण शेतीमालाला भाव नाही

नांदेड : सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री आता लोकात जावून पाच वर्षात काय दिवे लावले हे सांगत आहेत़ पण प्रत्यक्षात देशात आणि राज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असून कारखाने बंद पडत आहेत, शेतीमालाला भाव नाही, दरडोई उत्पन्नात घसरण होत आहे़ अशाही परिस्थितीत राज्यात नवे उद्योग येत असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किती कारखाने बंद पडले याची संख्या घोषीत करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी दिले.

नांदेडमध्ये गुरूवारी शरद पवार हे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते़ बीड, लातूर जिल्ह्याचा दौरा  करून पवार हे बुधवारी रात्री उशिरा नांदेडमध्ये दाखल झाले़ गुरूवारी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ़ प्रदीप नाईक, माजी आमदार शंकर धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.देश आणि राज्यातील परिस्थिती काय हे विचारताना राज्यात गेल्यावर्षी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पवार यांनी सांगितले़ नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ त्यात बँकांच्या लिलावाच्या नोटीस काढल्यानंतर जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे़ कृषीमंत्री असताना राज्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली़ त्यावेळी स्वत: त्या शेतकऱ्याच्या घरी जावून माहिती घेतली़ दिल्लीत परतल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठच दिवसात ७१ हजार रूपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याचेही ते म्हणाले़ 

आजचे भाजपा सरकार हे उद्योगपतींचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला़ दुसरीकडे आठ दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेने बंद पडलेल्या कारखानदारांचे तब्बल ८६ हजार कोटींचे कर्ज भरले आहे़ उद्योगांना कर्जमाफी करताना हाताना रोजगार मिळेल असे स्पष्टीकरण सरकार देत आहे़ पण त्याचवेळी पोटाला लागणारे अन्न पिकवणारा शेतकरी का दुर्लक्षीत केला जात आहे़  शेतीमालाचे भाव वाढले की सरकार इतर देशातून आयात करीत आहे़ ज्या पाकिस्तानाबाबत सरकार असे करू, तसे करू म्हणत आहे त्याच पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली जात आहे़ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, सरकारने काय करायचे ते करावे असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNandedनांदेडBJPभाजपाState Governmentराज्य सरकार