शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

राज्यात किती उद्योग बंद पडले हे सरकारने घोषीत करावे- शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 13:47 IST

पोटाला लागणारे अन्न पिकवणारा शेतकरी का दुर्लक्षीत

ठळक मुद्देराज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण शेतीमालाला भाव नाही

नांदेड : सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री आता लोकात जावून पाच वर्षात काय दिवे लावले हे सांगत आहेत़ पण प्रत्यक्षात देशात आणि राज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असून कारखाने बंद पडत आहेत, शेतीमालाला भाव नाही, दरडोई उत्पन्नात घसरण होत आहे़ अशाही परिस्थितीत राज्यात नवे उद्योग येत असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किती कारखाने बंद पडले याची संख्या घोषीत करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी दिले.

नांदेडमध्ये गुरूवारी शरद पवार हे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते़ बीड, लातूर जिल्ह्याचा दौरा  करून पवार हे बुधवारी रात्री उशिरा नांदेडमध्ये दाखल झाले़ गुरूवारी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ़ प्रदीप नाईक, माजी आमदार शंकर धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.देश आणि राज्यातील परिस्थिती काय हे विचारताना राज्यात गेल्यावर्षी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पवार यांनी सांगितले़ नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ त्यात बँकांच्या लिलावाच्या नोटीस काढल्यानंतर जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे़ कृषीमंत्री असताना राज्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली़ त्यावेळी स्वत: त्या शेतकऱ्याच्या घरी जावून माहिती घेतली़ दिल्लीत परतल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठच दिवसात ७१ हजार रूपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याचेही ते म्हणाले़ 

आजचे भाजपा सरकार हे उद्योगपतींचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला़ दुसरीकडे आठ दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेने बंद पडलेल्या कारखानदारांचे तब्बल ८६ हजार कोटींचे कर्ज भरले आहे़ उद्योगांना कर्जमाफी करताना हाताना रोजगार मिळेल असे स्पष्टीकरण सरकार देत आहे़ पण त्याचवेळी पोटाला लागणारे अन्न पिकवणारा शेतकरी का दुर्लक्षीत केला जात आहे़  शेतीमालाचे भाव वाढले की सरकार इतर देशातून आयात करीत आहे़ ज्या पाकिस्तानाबाबत सरकार असे करू, तसे करू म्हणत आहे त्याच पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली जात आहे़ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, सरकारने काय करायचे ते करावे असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNandedनांदेडBJPभाजपाState Governmentराज्य सरकार