शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोदावरी महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:55 IST

परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़

ठळक मुद्देसमितीसह प्रशासनाची तयारी : मंगळवारी मानकरी दिंड्यांची गळाभेट

नांदेड : परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़गोदावरी महामहोत्सवानिमित्त ३ ते ६ फेब्रुवारी या कलावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, जलप्रदूषण, कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू आंतरपीक फळबाग मॉडेल, नदीजोड, रेल्वे विकास, कृषी उद्योग, टेक्सटाईल पार्क, कौशल्य विकास, दुप्पट कृषी उत्पन्न, फार्मर प्रोड्युसर कंपनी, भाषा बोली लिपी उत्सव आदी विषयांवर शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे़ पौष अमावास्या काळात हा महामहोत्सव साजरा करण्यात येतो़ सोमवती पौष अमावास्या ४ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री २ वाजेनंतर सुरू होवून सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे़ स्नानासाठी हा पवित्र काळ आहे़ त्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी शहराच्या चोहोबाजूने तुकाराम महाराज येळेगावकर दिंडी, भानुदास महाराज दिंडी, नंदी महाराज दिंडी वाकळेवाडी दिंडी तसेच सोनखेड, चुडावा, निळा, वसमत, म्हैसा आदी ठिकाणांहून दिंड्या, जथ्थे, भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होतील़महामहोत्सवात ५ फेब्रुवारी रोजी संत दासगणू नावघाटावर मानकरी दिंड्या ह़भ़प़ भागवत महाराज व हभप हरिमहाराज यांचे दर्गासराय येथे स्वागत गळाभेट दर्गाप्रमुख अंगारे शाह करतील़ सकाळी ६ वाजता संत लिंगूअप्पा साळी व अंबाजी हकीम, कल्याणराव समाधी, गंगागोदावरी देवीपूजन होईल़ भाषाभगिनी संगम मराठी, उर्दू, हिंदी, सिंधी, तेलगू, कन्नड, गुजराती बोली भाषा वर्षानिमित्त गोन्डी गोर बंजारा, मारवाडी, कैकाडी, वडारी भाषिक मान्यवर मार्गदर्शन करतील़दिलीप चव्हाण : मराठी भाषा संकटातभाषा बोली लिपी ज्ञान तंत्रज्ञान विज्ञानाची राहिली नाही तर ती बोलीभाषा होवून नष्ट होते़ जगात दर आठवड्याला चार भाषा नष्ट होतात़ मराठी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून वेळीच मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुल व भाषा बोली व लिपी अध्यासन संशोधन केंद्राचे संचालक डॉ़ दिलीप चव्हाण यांनी केले़ गोदावरी महामहोत्सव समिती आयोजित ‘भाषा बोली व लिपी विकासात प्रकाशक मुद्रक, पत्रकार, साहित्यिक, नाट्य, निबंध, इतिहास, ललितलेखक, वाचनालयाचे योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ यावेळी प्रा़डॉ़जगदीश कदम, प्रा़डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़डॉ़पुष्पा कोकीळ, पंजाब देशमुख, देवदत्त साने, संजय हाटकर, रामकिशन साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़दिलीप चव्हाण म्हणाले, कोणतीही भाषा नष्ट होण्यास राजकीय, आर्थिक उपयोगिता धोरण कारणीभूत ठरते़ आयरिस भाषा नष्ट झाली़ परंतु, न्यूझीलंडने आदिवासी मावरी भाषा वाचविल्याचे चव्हाण म्हणाले़ दरम्यान, निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा ‘भाषारत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला़जिल्हा प्रशासनाला समितीचे साकडेगोदावरी महामहोत्सवानिमित्त नांदेडात येणाऱ्या विविध दिंड्या, भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे़ येणाºया भक्तांसाठी पिण्याचे पाणी, स्नानासाठी प्रत्येक घाटावर कुंडनिर्मिती करावी, वीज, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे़ यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरी