शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:43 IST

तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुका : १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज४ कोटी ५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच

किनवट : तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यातही हा पाऊस धरसोड पद्धतीने झाल्याने नदी- नाले म्हणावे तसे भरून वाहिले नाही़ एवढेच नाहीतर भूगर्भातील पाणीपातळी म्हणावी तशी वाढली नाही़ तालुक्यातील छोटे-मोठे नाले नोव्हेंबरच्या शेवटी पार कोरडेठाक पडले़ परिणामी नोव्हेंबरमध्येच पैनगंगा नदी व नाले आटले. प्रकल्पातील जसलसाठाही घटू लागला आहे़ ऊन, थंडी अशा वातावरणात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे सध्य चित्र आहे़ इस्लापूर भागात तर पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस कमी पडल्याने मे अखेर या भागात काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजारांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़जगदंबा तांडा, प्रेमनगर, दिगडी (मं), जवरला, मोहाडा, मोहपूरखेडी, पळशी, परशरामनाईक तांडा, राजगड, राजगडखेडी, भामपूर, रिठा, बुरकुलवाडी, शिवणी (ई) व नदी काठावरील धानोरा (सी) आणि गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरग्रस्त असलेल्या मारेंगाव (वरचे) अशी सोळा गावे, वस्त्या टँकरग्रस्त असल्याने आराखड्यात प्रस्तावित असून २७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ जगदंबातांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती ५२ ठिकाणी प्रस्तावित आहे़ त्यासाठी ६ लाख २४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ ९० ठिकाणी विहीर, बोअर अधिग्रहण करणे प्रस्तावित असून १५ लक्ष ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विहीर खोल करणे व गाळ काढणे यासाठी ४१ कामे प्रस्तावित असून ४१ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी. टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना आ़प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़ येत्या काळात टंचाईची काय परिस्थिती राहते ते लवकर समजेल. वेळीच प्रस्तावित आराखड्याला मंजुरी मिळाली तर उपाययोजना वेळीच राबविणे सोयीचे होईल, हे तितकेच खरे़संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सूचनागेल्या कित्येक वर्षांत जानेवारी ते मार्च या कालावधीत पहिल्यांदाच चार कोटी रुपयांचा आराखडा उपाययोजना राबविण्यासाठी पंचायत समितीने तयार केला आहे़ तर आठ-नऊ वर्षांत टँकरग्रस्त गावांचा पहिल्यांदाच आकडा वाढल्याचे हाती आलेल्या टंचाई आराखड्यावरून दिसून येत आहे़ वेगवेगळ्या ४९० कामांची संख्या तीन महिन्यांच्या कालावधीत आहे़ मात्र वेळीच उपाययोजना राबविण्यासाठी आराखड्याला मंजुरी देण्यात आली नसल्याने टंचाईची तीव्रता वाढल्यावर मंजुरी मिळेल का असा सवाल विचारला जात आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी़ टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही़ संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित

  • जगदंबा तांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे़
  • जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़
  • किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई