शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:43 IST

तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुका : १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज४ कोटी ५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच

किनवट : तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यातही हा पाऊस धरसोड पद्धतीने झाल्याने नदी- नाले म्हणावे तसे भरून वाहिले नाही़ एवढेच नाहीतर भूगर्भातील पाणीपातळी म्हणावी तशी वाढली नाही़ तालुक्यातील छोटे-मोठे नाले नोव्हेंबरच्या शेवटी पार कोरडेठाक पडले़ परिणामी नोव्हेंबरमध्येच पैनगंगा नदी व नाले आटले. प्रकल्पातील जसलसाठाही घटू लागला आहे़ ऊन, थंडी अशा वातावरणात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे सध्य चित्र आहे़ इस्लापूर भागात तर पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस कमी पडल्याने मे अखेर या भागात काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजारांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़जगदंबा तांडा, प्रेमनगर, दिगडी (मं), जवरला, मोहाडा, मोहपूरखेडी, पळशी, परशरामनाईक तांडा, राजगड, राजगडखेडी, भामपूर, रिठा, बुरकुलवाडी, शिवणी (ई) व नदी काठावरील धानोरा (सी) आणि गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरग्रस्त असलेल्या मारेंगाव (वरचे) अशी सोळा गावे, वस्त्या टँकरग्रस्त असल्याने आराखड्यात प्रस्तावित असून २७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ जगदंबातांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती ५२ ठिकाणी प्रस्तावित आहे़ त्यासाठी ६ लाख २४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ ९० ठिकाणी विहीर, बोअर अधिग्रहण करणे प्रस्तावित असून १५ लक्ष ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विहीर खोल करणे व गाळ काढणे यासाठी ४१ कामे प्रस्तावित असून ४१ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी. टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना आ़प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़ येत्या काळात टंचाईची काय परिस्थिती राहते ते लवकर समजेल. वेळीच प्रस्तावित आराखड्याला मंजुरी मिळाली तर उपाययोजना वेळीच राबविणे सोयीचे होईल, हे तितकेच खरे़संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सूचनागेल्या कित्येक वर्षांत जानेवारी ते मार्च या कालावधीत पहिल्यांदाच चार कोटी रुपयांचा आराखडा उपाययोजना राबविण्यासाठी पंचायत समितीने तयार केला आहे़ तर आठ-नऊ वर्षांत टँकरग्रस्त गावांचा पहिल्यांदाच आकडा वाढल्याचे हाती आलेल्या टंचाई आराखड्यावरून दिसून येत आहे़ वेगवेगळ्या ४९० कामांची संख्या तीन महिन्यांच्या कालावधीत आहे़ मात्र वेळीच उपाययोजना राबविण्यासाठी आराखड्याला मंजुरी देण्यात आली नसल्याने टंचाईची तीव्रता वाढल्यावर मंजुरी मिळेल का असा सवाल विचारला जात आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी़ टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही़ संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित

  • जगदंबा तांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे़
  • जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़
  • किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई