शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लिंबोटीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:56 IST

शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकंधार पाणीपुरवठा योजनाविद्युत जोडणीमुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली

कंधार : शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली असून आगामी काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहराचे पाणीपुरवठ्याचे स्त्रोत असलेले मानार नदी व जगतुंग समुद्र अल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडत होते.त्यामुळे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी गत झाली होती. पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून शहराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. अप्पर मानार प्रकल्पातील (लिंबोटी) पाणी यासाठी गृहीत धरण्यात आले होते. जून २०११ च्या सर्वसाधारण सभेने नवीन पा.पु.यो. आराखडा तयार करण्यासाठी मंजुरी दिली. प्रस्ताव जून २०१३ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे दाखल झाला. याच महिन्यात संबंधित विभागाने तांत्रिक सहमती दिली. प्रशासकीय मान्यतेसाठी पा.पु.व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवांकडे प्रस्ताव दाखल झाला़ पाणीपुरवठामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक डिसेंबर २०१३ ला झाली. बैठकीतील निर्देशानुसार म.जी.प्रा. विभागाने आराखड्यास तांत्रिक मान्यता दिली व प्रस्ताव शासनास फेर सादर करण्यात आला. पा.पु.सचिवांनी काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्रुटींची पूर्तता व योग्य दुरूस्ती करून सुधारित प्रस्ताव फेब्रुवारी २०१४ ला मुख्य अभियंता म.जी.प्रा.कडे सादर झाला आणि सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली. आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. ई- निविदा प्रसिद्ध झाली. आॅगस्ट २०१४ ला कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित गुत्तेदारास देण्यात आला. काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६ महिने देण्यात आला. कामाला धडाक्यात सुरूवात झाली. लिंबोटी प्रकल्पात उद्भव विहीर व संबंधित कामे, पंपगृह, पंम्पिंग मशिनरी, अशुद्ध गुरूत्त्व जलवाहिनी २२.५० कि.मी.,शहराच्या नवीन विकसित भागात वितरण व जलकुंभ आदी कामे प्रस्तावित होती. जवळपास ही कामे पूर्ण झाली. थोडीशी व जुजबी कामे शिल्लक आहेत. मात्र खरा प्रश्न हा विद्युत जोडणीचा होता.११ के.व्ही.एक्स्प्रेस फिडरच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न लांबणीवर पडत चालला होता. कोटेशन भरूनही कामाला मुहूर्त लागत नव्हता. नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत होता. आजसुद्धा अनेक महिन्यांपासून नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळते. पालिकेतील सत्तापालट व टोकाचे राजकीय हेवेदावे यामुळे योजना कार्यान्वित होण्यास अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला.आता विद्युत जोडणी झाली आहे. ९० एच.पी.मोटारीची चाचणी झाली आहे. शहरातील जलवाहिनीचे थोडेसे काम शिल्लक आहे. लिंबोटी ते शहर जलवाहिनी तपासणी केली जात आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालू आहे. जी.आय.एस.मॅपिंग करायची आहे. ही कामे झाल्यानंतर मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होईल. डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळेल, अशी स्थिती आहे़

  • नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पा.पु.योजनेची कामे पूर्ण होत आली आहेत. शिल्लक थोडी कामे पूर्ण करण्यासाठी भर दिला जाईल.
  • महत्त्वाचे विद्युत जोडणीचे काम होते.ते पूर्ण झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे़ डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळण्याची शक्यता आहे़

पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईलविद्युत जोडणी झाली आहे. जी.आय.एस.सर्वे आॅनलाईन शिल्लक आहे. शहरातील जलवाहिनीचे काही काम अत्यल्प आहे. ही कामे करण्यावर भर दिला जाईल.लिंबोटी प्रकल्पातील ०.५० द.ल.घ.मी. पाणी आरक्षणासाठी पत्र दिले आहे.बारूळ प्रकल्पाच्या बहाद्दरपुरा येथील विहिरीचे १.५० द.ल.घ.मी .पाणी आरक्षित केले आहे. पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईल.- सारंग चव्हाण (प्र.मुख्याधिकारी न.प.कंधार)

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई