शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिंबोटीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:56 IST

शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकंधार पाणीपुरवठा योजनाविद्युत जोडणीमुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली

कंधार : शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली असून आगामी काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहराचे पाणीपुरवठ्याचे स्त्रोत असलेले मानार नदी व जगतुंग समुद्र अल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडत होते.त्यामुळे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी गत झाली होती. पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून शहराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. अप्पर मानार प्रकल्पातील (लिंबोटी) पाणी यासाठी गृहीत धरण्यात आले होते. जून २०११ च्या सर्वसाधारण सभेने नवीन पा.पु.यो. आराखडा तयार करण्यासाठी मंजुरी दिली. प्रस्ताव जून २०१३ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे दाखल झाला. याच महिन्यात संबंधित विभागाने तांत्रिक सहमती दिली. प्रशासकीय मान्यतेसाठी पा.पु.व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवांकडे प्रस्ताव दाखल झाला़ पाणीपुरवठामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक डिसेंबर २०१३ ला झाली. बैठकीतील निर्देशानुसार म.जी.प्रा. विभागाने आराखड्यास तांत्रिक मान्यता दिली व प्रस्ताव शासनास फेर सादर करण्यात आला. पा.पु.सचिवांनी काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्रुटींची पूर्तता व योग्य दुरूस्ती करून सुधारित प्रस्ताव फेब्रुवारी २०१४ ला मुख्य अभियंता म.जी.प्रा.कडे सादर झाला आणि सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली. आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. ई- निविदा प्रसिद्ध झाली. आॅगस्ट २०१४ ला कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित गुत्तेदारास देण्यात आला. काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६ महिने देण्यात आला. कामाला धडाक्यात सुरूवात झाली. लिंबोटी प्रकल्पात उद्भव विहीर व संबंधित कामे, पंपगृह, पंम्पिंग मशिनरी, अशुद्ध गुरूत्त्व जलवाहिनी २२.५० कि.मी.,शहराच्या नवीन विकसित भागात वितरण व जलकुंभ आदी कामे प्रस्तावित होती. जवळपास ही कामे पूर्ण झाली. थोडीशी व जुजबी कामे शिल्लक आहेत. मात्र खरा प्रश्न हा विद्युत जोडणीचा होता.११ के.व्ही.एक्स्प्रेस फिडरच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न लांबणीवर पडत चालला होता. कोटेशन भरूनही कामाला मुहूर्त लागत नव्हता. नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत होता. आजसुद्धा अनेक महिन्यांपासून नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळते. पालिकेतील सत्तापालट व टोकाचे राजकीय हेवेदावे यामुळे योजना कार्यान्वित होण्यास अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला.आता विद्युत जोडणी झाली आहे. ९० एच.पी.मोटारीची चाचणी झाली आहे. शहरातील जलवाहिनीचे थोडेसे काम शिल्लक आहे. लिंबोटी ते शहर जलवाहिनी तपासणी केली जात आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालू आहे. जी.आय.एस.मॅपिंग करायची आहे. ही कामे झाल्यानंतर मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होईल. डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळेल, अशी स्थिती आहे़

  • नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पा.पु.योजनेची कामे पूर्ण होत आली आहेत. शिल्लक थोडी कामे पूर्ण करण्यासाठी भर दिला जाईल.
  • महत्त्वाचे विद्युत जोडणीचे काम होते.ते पूर्ण झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे़ डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळण्याची शक्यता आहे़

पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईलविद्युत जोडणी झाली आहे. जी.आय.एस.सर्वे आॅनलाईन शिल्लक आहे. शहरातील जलवाहिनीचे काही काम अत्यल्प आहे. ही कामे करण्यावर भर दिला जाईल.लिंबोटी प्रकल्पातील ०.५० द.ल.घ.मी. पाणी आरक्षणासाठी पत्र दिले आहे.बारूळ प्रकल्पाच्या बहाद्दरपुरा येथील विहिरीचे १.५० द.ल.घ.मी .पाणी आरक्षित केले आहे. पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईल.- सारंग चव्हाण (प्र.मुख्याधिकारी न.प.कंधार)

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई