शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लिंबोटीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:56 IST

शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकंधार पाणीपुरवठा योजनाविद्युत जोडणीमुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली

कंधार : शहरातील नागरिकांना गत काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अखेर पाणीपुरवठा योजनेचा स्वतंत्र विद्युत जोडणीचा प्रश्न मार्गी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईची टांगती तलवार हटली असून आगामी काळात नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहराचे पाणीपुरवठ्याचे स्त्रोत असलेले मानार नदी व जगतुंग समुद्र अल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडत होते.त्यामुळे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी गत झाली होती. पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून शहराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. अप्पर मानार प्रकल्पातील (लिंबोटी) पाणी यासाठी गृहीत धरण्यात आले होते. जून २०११ च्या सर्वसाधारण सभेने नवीन पा.पु.यो. आराखडा तयार करण्यासाठी मंजुरी दिली. प्रस्ताव जून २०१३ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे दाखल झाला. याच महिन्यात संबंधित विभागाने तांत्रिक सहमती दिली. प्रशासकीय मान्यतेसाठी पा.पु.व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवांकडे प्रस्ताव दाखल झाला़ पाणीपुरवठामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक डिसेंबर २०१३ ला झाली. बैठकीतील निर्देशानुसार म.जी.प्रा. विभागाने आराखड्यास तांत्रिक मान्यता दिली व प्रस्ताव शासनास फेर सादर करण्यात आला. पा.पु.सचिवांनी काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्रुटींची पूर्तता व योग्य दुरूस्ती करून सुधारित प्रस्ताव फेब्रुवारी २०१४ ला मुख्य अभियंता म.जी.प्रा.कडे सादर झाला आणि सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली. आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीच्या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. ई- निविदा प्रसिद्ध झाली. आॅगस्ट २०१४ ला कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित गुत्तेदारास देण्यात आला. काम पूर्ण करण्याचा कालावधी ३६ महिने देण्यात आला. कामाला धडाक्यात सुरूवात झाली. लिंबोटी प्रकल्पात उद्भव विहीर व संबंधित कामे, पंपगृह, पंम्पिंग मशिनरी, अशुद्ध गुरूत्त्व जलवाहिनी २२.५० कि.मी.,शहराच्या नवीन विकसित भागात वितरण व जलकुंभ आदी कामे प्रस्तावित होती. जवळपास ही कामे पूर्ण झाली. थोडीशी व जुजबी कामे शिल्लक आहेत. मात्र खरा प्रश्न हा विद्युत जोडणीचा होता.११ के.व्ही.एक्स्प्रेस फिडरच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न लांबणीवर पडत चालला होता. कोटेशन भरूनही कामाला मुहूर्त लागत नव्हता. नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत होता. आजसुद्धा अनेक महिन्यांपासून नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळते. पालिकेतील सत्तापालट व टोकाचे राजकीय हेवेदावे यामुळे योजना कार्यान्वित होण्यास अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला.आता विद्युत जोडणी झाली आहे. ९० एच.पी.मोटारीची चाचणी झाली आहे. शहरातील जलवाहिनीचे थोडेसे काम शिल्लक आहे. लिंबोटी ते शहर जलवाहिनी तपासणी केली जात आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालू आहे. जी.आय.एस.मॅपिंग करायची आहे. ही कामे झाल्यानंतर मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होईल. डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळेल, अशी स्थिती आहे़

  • नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पा.पु.योजनेची कामे पूर्ण होत आली आहेत. शिल्लक थोडी कामे पूर्ण करण्यासाठी भर दिला जाईल.
  • महत्त्वाचे विद्युत जोडणीचे काम होते.ते पूर्ण झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे़ डिसेंबर अथवा जानेवारीत पाणी मिळण्याची शक्यता आहे़

पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईलविद्युत जोडणी झाली आहे. जी.आय.एस.सर्वे आॅनलाईन शिल्लक आहे. शहरातील जलवाहिनीचे काही काम अत्यल्प आहे. ही कामे करण्यावर भर दिला जाईल.लिंबोटी प्रकल्पातील ०.५० द.ल.घ.मी. पाणी आरक्षणासाठी पत्र दिले आहे.बारूळ प्रकल्पाच्या बहाद्दरपुरा येथील विहिरीचे १.५० द.ल.घ.मी .पाणी आरक्षित केले आहे. पाणीपुरवठा थोड्याच दिवसांत सुरळीत होईल.- सारंग चव्हाण (प्र.मुख्याधिकारी न.प.कंधार)

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई