शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

बोगस खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:57 IST

जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देमातीमिश्रित खततपासणी होत नसल्याने बोगस खतांची निर्मिती

नांदेड : जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खतांची निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत तर लातूर येथेही एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये निर्मित होणा-या खताच्या गुणवत्तेबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अशी तपासणी होत नसल्यान बोगस खतनिर्मितीला चालनाच मिळत आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन खत कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात अशा कारखान्यातून वितरित झालेल्या खताचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. हजारो मेट्रीक टन बोगस खत आज शेतकºयांच्या माथी मारण्यात आले आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून शेतकरी कसेतरी पेरण्या करीत आहेत. या पेरणीनंतर शेतक-यांना मिश्र खतांची गरज असते. हे मिश्र खत मातीमिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात पारसेवार अ‍ॅग्रो प्रा.लि. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचा दर्जा तपासण्यासाठी कृषि विभागाने तो संबंधित विभागाकडे पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच खताची विक्री सुरू होती़नामांकित कंपन्यांचीच मिश्र खते वापरावीतशेतक-यांनी मिश्र खते घेताना केंद्र सरकारच्या नियंत्रणातील नामांकित कंपन्याचेच मिश्र खते वापरणे सद्य-स्थितीत आवश्यक आहे. स्थानिक कारखान्यात मिश्र खतामध्ये ज्या प्रमाणात रासायनिक घटकांची गरज असते ती घटक उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे. यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण शेतीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. शेतक-यांनी मिश्र खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कानवडे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती