शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बोगस खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:57 IST

जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देमातीमिश्रित खततपासणी होत नसल्याने बोगस खतांची निर्मिती

नांदेड : जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खतांची निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत तर लातूर येथेही एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये निर्मित होणा-या खताच्या गुणवत्तेबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अशी तपासणी होत नसल्यान बोगस खतनिर्मितीला चालनाच मिळत आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन खत कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात अशा कारखान्यातून वितरित झालेल्या खताचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. हजारो मेट्रीक टन बोगस खत आज शेतकºयांच्या माथी मारण्यात आले आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून शेतकरी कसेतरी पेरण्या करीत आहेत. या पेरणीनंतर शेतक-यांना मिश्र खतांची गरज असते. हे मिश्र खत मातीमिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात पारसेवार अ‍ॅग्रो प्रा.लि. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचा दर्जा तपासण्यासाठी कृषि विभागाने तो संबंधित विभागाकडे पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच खताची विक्री सुरू होती़नामांकित कंपन्यांचीच मिश्र खते वापरावीतशेतक-यांनी मिश्र खते घेताना केंद्र सरकारच्या नियंत्रणातील नामांकित कंपन्याचेच मिश्र खते वापरणे सद्य-स्थितीत आवश्यक आहे. स्थानिक कारखान्यात मिश्र खतामध्ये ज्या प्रमाणात रासायनिक घटकांची गरज असते ती घटक उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे. यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण शेतीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. शेतक-यांनी मिश्र खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कानवडे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती