शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बोगस खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:57 IST

जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देमातीमिश्रित खततपासणी होत नसल्याने बोगस खतांची निर्मिती

नांदेड : जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खतांची निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत तर लातूर येथेही एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये निर्मित होणा-या खताच्या गुणवत्तेबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अशी तपासणी होत नसल्यान बोगस खतनिर्मितीला चालनाच मिळत आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन खत कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात अशा कारखान्यातून वितरित झालेल्या खताचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. हजारो मेट्रीक टन बोगस खत आज शेतकºयांच्या माथी मारण्यात आले आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून शेतकरी कसेतरी पेरण्या करीत आहेत. या पेरणीनंतर शेतक-यांना मिश्र खतांची गरज असते. हे मिश्र खत मातीमिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात पारसेवार अ‍ॅग्रो प्रा.लि. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचा दर्जा तपासण्यासाठी कृषि विभागाने तो संबंधित विभागाकडे पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच खताची विक्री सुरू होती़नामांकित कंपन्यांचीच मिश्र खते वापरावीतशेतक-यांनी मिश्र खते घेताना केंद्र सरकारच्या नियंत्रणातील नामांकित कंपन्याचेच मिश्र खते वापरणे सद्य-स्थितीत आवश्यक आहे. स्थानिक कारखान्यात मिश्र खतामध्ये ज्या प्रमाणात रासायनिक घटकांची गरज असते ती घटक उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे. यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण शेतीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. शेतक-यांनी मिश्र खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कानवडे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती