शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वाळूच्या धक्क्यांचा लिलाव न झाल्याने दरात चार पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 19:37 IST

जिल्ह्यात साधारणता मार्च ते एप्रिल या महिन्यात वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात येतात़

ठळक मुद्देरात्री आठ वाजता सुरु होते वाहतूक हायवा ४० हजार तर टेम्पो ५ हजार रुपयांना 

नांदेड :वाळू धक्क्यांचा अद्याप लिलावच न झाल्यामुळे वाळूच्या दरात चार पटीने वाढ झाली आहे़ छुप्प्या मार्गाने वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असून गोदापात्राच्या शेजारील शेतांमध्ये त्याचा साठा करण्यात येत आहे़ नांदेड शहरात गोदावरी, आसना, कौठा परिसर, पश्चिम वळण रस्ता या ठिकाणाहून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत छोट्या वाहनाद्वारे या वाळूची वाहतुक करण्यात येते़ प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु आहे़ परंतु अद्यापही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही़

जिल्ह्यात साधारणता मार्च ते एप्रिल या महिन्यात वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात येतात़ त्यातून प्रशासनाला मोठा महसूलही मिळतो़ परंतु अद्याप लिलाव झाले नसल्यामुळे वाळूची टंचाई भासत आहे़ त्यामुळे अनेक बांधकामे रखडली आहेत़ त्यामुळे बांधकाम व्यावसायिक  किंवा स्वत: बांधकाम करणारे मिळेल त्या भावाने वाळू खरेदी करीत आहेत़ आजघडीला ४०७ हा वाळूचा टेम्पो जवळपास पाच हजार रुपयांना मिळत आहे़ तर हायवा ४० ते ५० हजारांच्या घरात गेला आहे़ शहरातील कौठा, पश्चिम वळण रस्ता, गोवर्धन घाट या भागात वाळू उपसा करण्याची परवानगी नाही़ 

परंतु या ठिकाणी रात्रभर वाळू उपसा करण्यात येतो़ वजिराबाद ते गोवर्धन घाट रस्त्याच्या कडेलाच वाळू उपसा करणारी ही वाहने दिवसभर उभी असतात़ रात्री आठ वाजेनंतर वाळू वाहतुकीला जोर चढतो़ रात्रभर हा बिनबोभाटपणे हा वाळू उपसा सुरु आहे़ असे असताना तलाठी, तहसिलदार, पोलिस प्रशासन यांच्याकडून या वाळू माफीयांवर कुठलीही कारवाई केली जात नाही़ कौठा भागातून रात्रभर जवळपास तीनशेहून अधिक टेम्पोच्या फेऱ्या मारण्यात येतात़ त्यामुळे रस्त्यांचीही वाट लागली आहे़ शाळा व्यवस्थापन, ग्रामस्थांनी केली होती तक्रार

कौठा भागात जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेच्या समोरुनच वाहनाद्वारे वाळू आणली होती़ त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होतो़ याबाबत ग्रामस्थ व शालेय शिक्षण समितीने शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते़ परंतु गेल्या दोन वर्षापासून शाळेच्या या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे़ आसना व इतर ठिकाणच्या वाळूमध्ये मातीचे मिश्रण असते़ त्यामुळे उपसा केल्यानंतर शेजारील शेतात वाळू धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ या ठिकाणी टेम्पोत पाण्याचा पाईप सोडून ती वाळू धुऊन घेण्यात येते़ गोदावरी काठावरील अनेक शेतात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करण्यात आले आहेत़

याबाबत कौठा भागातील तलाठी मनोजराव देवणे यांच्याशी संपर्क साधला असता, वाळू उपसा पुन्हा सुरु असल्याबाबत ते अनभिज्ञ होते़ काही दिवसापूर्वीच वाळू माफीयावर कारवाई केली होती़ त्यांना दंडही लावला होता़ पुन्हा एकदा कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले़ तसेच या भागात वाळू उपसा सुरु नसल्याचेही ठामपणे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिसNandedनांदेड