शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेड जिल्ह्यात शेतात लागणार चार हजार स्मार्ट विजेचे मीटर

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: January 9, 2024 19:20 IST

वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात.

नांदेड : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने कृषीपंप चालण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे, त्यात तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी महावितरणकडून कृषीपंपासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र डीपी बसविलेल्या चार हजार शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

ग्रामीण भागात अनेकवेळा वीज गुल होत असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे वेळेवर ओलित करणे शक्य नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला सोसावा लागतो. ज्या शेतकऱ्याने स्वतंत्र डीपीची मागणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार मागेल त्या शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी द्यावा, असा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आला होता. पण, सर्व शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी देणे शक्य नसल्याचे म्हणत सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने स्वतंत्र डीपीसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतापासून २०० मीटर अंतरावरून वीजतारा गेलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी आहे त्या डीपीवरून कृषीपंप सुरू ठेवायचा आहे. तर २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र डीपीची मागणी केल्यास त्यांना बसवून देण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतापासून ६०० मीटरपेक्षा जास्त दुरून तारा गेलेल्या असतील, अशा शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प बसवून देण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात एकही प्रिपेड मीटर बसविले नाहीप्रिपेड मीटर बसविण्यापूर्वी स्मार्ट मीटरची एक स्टेप असून, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर प्रिपेड मीटर दिले जाते. परंतु, या मीटरलाच प्रिपेड मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्याची व्यवस्था आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकाही ग्राहकाला प्रिपेड मीटर बसविण्यात आलेले नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र