शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नांदेड जिल्ह्यात शेतात लागणार चार हजार स्मार्ट विजेचे मीटर

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: January 9, 2024 19:20 IST

वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात.

नांदेड : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने कृषीपंप चालण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे, त्यात तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी महावितरणकडून कृषीपंपासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र डीपी बसविलेल्या चार हजार शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

ग्रामीण भागात अनेकवेळा वीज गुल होत असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे वेळेवर ओलित करणे शक्य नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला सोसावा लागतो. ज्या शेतकऱ्याने स्वतंत्र डीपीची मागणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार मागेल त्या शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी द्यावा, असा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आला होता. पण, सर्व शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी देणे शक्य नसल्याचे म्हणत सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने स्वतंत्र डीपीसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतापासून २०० मीटर अंतरावरून वीजतारा गेलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी आहे त्या डीपीवरून कृषीपंप सुरू ठेवायचा आहे. तर २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र डीपीची मागणी केल्यास त्यांना बसवून देण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतापासून ६०० मीटरपेक्षा जास्त दुरून तारा गेलेल्या असतील, अशा शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प बसवून देण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात एकही प्रिपेड मीटर बसविले नाहीप्रिपेड मीटर बसविण्यापूर्वी स्मार्ट मीटरची एक स्टेप असून, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर प्रिपेड मीटर दिले जाते. परंतु, या मीटरलाच प्रिपेड मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्याची व्यवस्था आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकाही ग्राहकाला प्रिपेड मीटर बसविण्यात आलेले नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र