शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नांदेड जिल्ह्यात शेतात लागणार चार हजार स्मार्ट विजेचे मीटर

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: January 9, 2024 19:20 IST

वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात.

नांदेड : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने कृषीपंप चालण्यास अडचणी येतात. शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे, त्यात तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी महावितरणकडून कृषीपंपासाठी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र डीपी बसविलेल्या चार हजार शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर बसवून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

ग्रामीण भागात अनेकवेळा वीज गुल होत असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने कृषीपंप चालण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे वेळेवर ओलित करणे शक्य नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला सोसावा लागतो. ज्या शेतकऱ्याने स्वतंत्र डीपीची मागणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार मागेल त्या शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी द्यावा, असा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आला होता. पण, सर्व शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी देणे शक्य नसल्याचे म्हणत सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने स्वतंत्र डीपीसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतापासून २०० मीटर अंतरावरून वीजतारा गेलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी आहे त्या डीपीवरून कृषीपंप सुरू ठेवायचा आहे. तर २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र डीपीची मागणी केल्यास त्यांना बसवून देण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतापासून ६०० मीटरपेक्षा जास्त दुरून तारा गेलेल्या असतील, अशा शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प बसवून देण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात एकही प्रिपेड मीटर बसविले नाहीप्रिपेड मीटर बसविण्यापूर्वी स्मार्ट मीटरची एक स्टेप असून, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर प्रिपेड मीटर दिले जाते. परंतु, या मीटरलाच प्रिपेड मीटरमध्ये कन्व्हर्ट करण्याची व्यवस्था आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकाही ग्राहकाला प्रिपेड मीटर बसविण्यात आलेले नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र