शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

महसूलसह वन विभागही सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:15 IST

जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील काही भाग हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही गतीविधी करता येणार नाहीत, असे स्पष्ट नमूद असल्याने या भागात वाळू उत्खनन अथवा वाळू वाहतूक होऊ देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना दिले आहेत.

ठळक मुद्देवाळूमाफियांच्या आवळणार मुसक्याजिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आदेश

नांदेड : जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील काही भाग हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सदर संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही गतीविधी करता येणार नाहीत, असे स्पष्ट नमूद असल्याने या भागात वाळू उत्खनन अथवा वाळू वाहतूक होऊ देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना दिले आहेत.केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार किनवट व माहूर तालुक्यांतील काही भाग पैनगंगा वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. या अधिसूचनेनुसार पैनगंगा वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्राभोवती एक किलोमीटरच्या इको सेन्सीटीव्ह झोन अर्थात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही गतीविधी करता येणार नाहीत, असे स्पष्ट नमूद केले आहे. या अधिसूचनेत उत्खननाचा समावेश आहे.केंद्र शासनाची ही अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी किनवट व माहूर तालुक्यांतील रेतीघाट लिलावात ठेवून रेती उत्खननासाठी परवानगी देण्यात येत होती. परंतु, याबाबत वन विभागानेच महसूल विभागाला अभिप्राय देत किनवट व माहूर तालुक्यांतील रेतीघाटांना रेती उत्खननासाठी प्रतिबंध असल्याने अनुमती देण्यात आली नाही. वन विभागाने दिलेल्या या अभिप्रायानुसार किनवट व माहूर तालुक्यांतील रेतीघाट लिलावात ठेवण्यात आले नाहीत.त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यांतील इकोसेन्सीटीव्ह झोन या संवेदनशील क्षेत्रात रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.या तक्रारीनंतर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. ९ फेब्रुवारी रोजी एका ट्रॅक्टरसह जवळपास २०० ते ३०० ब्रास वाळूसाठा जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने जप्त केला. तर १० फेब्रुवारी रोजी नेर ते लांजी चौफुली परिसरात रेती वाहतूक करणारे ५ टिप्परसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.किनवट व माहूर तालुक्यांतील संवेदनशील क्षेत्रात होणाऱ्या गौण खनिज उत्खनन व अन्य गतिविधीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाच्या क्षेत्रातंर्गत गस्ती पथकामार्फत अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करावी, सदर कारवाईचा अनुपालन अहवाल दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावा, असेही सूचित केले आहे. जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशामुळे आता माहूर व किनवट तालुक्यांतील संवेदनशील क्षेत्रात वाळू वाहतूक व वाळू उत्खनन करणे ही बाब गंभीर गुन्हा ठरणार आहे. महसूल विभागासह आता वन विभागही वाळूमाफियांच्या मुसक्या आवळणार आहे.रेती उत्खननावर कोणतेही संनियंत्रण नाहीकिनवट व माहूर तालुक्यांतील पैनगंगा वन्य जीव अभयारण्य घोषित केल्याची अधिसूचना केंद्र शासनाने काढली आहे. परंतु प्रत्यक्षात उपरोक्त अधिसूचनेतील निर्देशात वन विभागाच्या क्षेत्रात होणा-या रेती उत्खननावर वन विभागामार्फत कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या संवेदनशील क्षेत्रातून रेती उत्खनन सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा अवैध रेती उत्खनन करणा-याविरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी