शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:26 IST

जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड : उमरी, मुदखेड, भोकर, नांदेड तालुक्यांत अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/धर्माबाद : जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४९.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली. बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरण काठोकाठ भरले आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्याचा ओेघ कायम आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले़ हे पाणी पुढे निजामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड प्रकल्पात पोहोचले आहे.गेल्या २४ तासांत नांदेड तालुक्यात ७५.६३ मि.मी, मुदखेड ८२.६७ मि.मी, भोकर: ९२.७५ मि.मी तर उमरी तालुक्यात ६९.६९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धापूर ५८.६७, कंधार ४२.३३, लोहा ५७, किनवट २२़७१, माहूर २८, हदगाव ३५़५७, हिमायतनगर ३९़३३, देगलूर १५़५०, बिलोली ४६़२०, धर्माबाद ५७, नायगाव ५०़८० आणि मुदखेड तालुक्यात २०़८६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १७१़ २० मि़मी़ पावसाची नोंद झाली़ दरम्यान, रविवारी झालेल्या अतिवृष्टीने भोकर तालुक्यातील हाडोळी, पोमनाळा, कोळगाव खु. येथे घरांची पडझड झाली. भोसी परिसरात ताटकळवाडी शिवारात केळीचे नुकसान झाले़ अतिवृष्टीमुळे धारजनी येथे घराची भिंत पडून १२ वर्षाचा बालक दगावला तसेच अनेक घराची पडझड झाली आणि वीज पडून गाय दगावली आहे.परभणीत चौथ्या दिवशीही हजेरीच्परभणी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी रात्रीही सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ पावसामुळे पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.हिंगोलीत सरासरीच्या १६ टक्के पर्जन्यच्हिंगोली : यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या १५.९९ टक्के पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत अवघा ७.६५ टक्के पाऊस झाला होता. यंदा हिंगोली १४.८३ टक्के, वसमत-१८.९३, कळमनुरी १८.२८, औंढा नागनाथ-१३.९९, सेनगाव-१३.३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणRainपाऊस