शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मार्लेगाव - कोळी रस्ता मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:31 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देतळणी - निवघा सर्कलच्या गावांचा नांदेडसाठी फेरा कमी होणार

हदगाव (नांदेड ) :  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

उंचाडा गावाजवळील कयाधू नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये सात-आठ गावांचा संपर्क तुटतो, आता या गावांनाही या मार्गाचा चांगला उपयोग होणार आहे़ नेवरी गाव दोन समाजातील तेढसाठी राज्यात गाजले पण हा तणाव निवळत या गावालाही   रस्ते करीत मुख्य प्रवाहात आणण्यात आले.  नेवरी-कोळी रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने शेतक-यांना बाजारात येणे सोपे झाले आहे. यापूर्वी हा रस्ता चिखलात रुतलेला असायचा.  शेतातील माल हिवाळ्याशिवाय घरी आणता येत नसे़ आता मात्र दर पाच मिनिटाला घरी तर दुसºया पाच मिनिटात शेतात अशी परिस्थिती झाली. येथील अनेक शेतक-यांनी वीजजोडणी घेवून शेतामध्ये घरे बांधणे सुरू  केले आहे. गावात जनावरांना जागा नसल्याने व शेतात आता मुख्य रस्ता झाल्याने त्यांना तिथे राहणे सोयीचे झाले  आहे. असाच एक मार्ग चिंचगव्हाण-कार्ला-खरबी-केदारनाथ- तामसा असा झाल्याने आडमार्गावरील खरबी, कार्ला, चोरंबा, केदारनाथ ही गावे १०-२० मिनिटांमध्ये नांदेड-नागपूर राज्य मार्गावर आली आहेत.

मार्लेगाव, उंचाडा, पिंपरखेड, कोळी या पट्ट्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात़ त्यांना वाहतुकीसाठी हा रस्ता  सोयीचा होणार आहे़ याच कोळी-मार्लेगाव-निवघा जाण्यासाठी १०-२० मिनिटे लागतात़ मात्र रस्त्याअभावी मानवाडीफाटा-निवघा असा उलटा प्रवास करावा लागत असे़ या रस्त्याचे टेंडर झाले असून एक-दोन महिन्यांत कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली़  गायतोंड-मनाठा हा मार्गही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला़ त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी-ठाकरवाडी-रावणगाव-तामसा हा मार्गही झाला़ ठाकरवाडी-सावरगाव हा मार्ग मंजुरीसाठी टाकल्याचेही त्यांनी सांगितले़ रखडलेले मार्ग मार्गी लागले तर अनेक प्रश्न सुटणार, हे निश्चित़ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. 

२०-२५ गावांना हदगाववरुन नांदेड ये-जातळणी व निवघा या मंडळातील २०-२५ गावांना हदगाववरून नांदेडला ये-जा करावी लागते़ त्यामुळे वेळ जास्त लागत असून आर्थिक भूर्दंडही बसत आहे. परंतु गेली अनेक वर्षांपासून रखडलेला कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड-निवघा रस्ता मंजूर झाला आहे़ यामुळे तळणी, निवघा, उंचेगाव, आमगव्हाण, वाकी, मरडगा, हस्तरा-बोरगाव, शिरड, पेवा, चक्री, कोहळी, साप्ती, माटाळा, कोळी, नेवरवाडी, नेवरी या गावांंना नांदेडचा प्रवास करण्यासाठी ३० कि़मी़ लांबीचा फेरा कमी होणार आहे़ तळणी-निवघा सर्कलची गावे १५-२० कि़मी़ अंतरामध्ये सरळ बामणी फाट्यावर कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड मार्गे येणार आहेत़ यामुळे या फाट्याची बाजारपेठ वाढणार आहे़ पुढील काळात रेल्वे स्टेशनचा फायदाही या गावांना निश्चितच मिळणार आहे.