शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मार्लेगाव - कोळी रस्ता मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:31 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देतळणी - निवघा सर्कलच्या गावांचा नांदेडसाठी फेरा कमी होणार

हदगाव (नांदेड ) :  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

उंचाडा गावाजवळील कयाधू नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये सात-आठ गावांचा संपर्क तुटतो, आता या गावांनाही या मार्गाचा चांगला उपयोग होणार आहे़ नेवरी गाव दोन समाजातील तेढसाठी राज्यात गाजले पण हा तणाव निवळत या गावालाही   रस्ते करीत मुख्य प्रवाहात आणण्यात आले.  नेवरी-कोळी रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने शेतक-यांना बाजारात येणे सोपे झाले आहे. यापूर्वी हा रस्ता चिखलात रुतलेला असायचा.  शेतातील माल हिवाळ्याशिवाय घरी आणता येत नसे़ आता मात्र दर पाच मिनिटाला घरी तर दुसºया पाच मिनिटात शेतात अशी परिस्थिती झाली. येथील अनेक शेतक-यांनी वीजजोडणी घेवून शेतामध्ये घरे बांधणे सुरू  केले आहे. गावात जनावरांना जागा नसल्याने व शेतात आता मुख्य रस्ता झाल्याने त्यांना तिथे राहणे सोयीचे झाले  आहे. असाच एक मार्ग चिंचगव्हाण-कार्ला-खरबी-केदारनाथ- तामसा असा झाल्याने आडमार्गावरील खरबी, कार्ला, चोरंबा, केदारनाथ ही गावे १०-२० मिनिटांमध्ये नांदेड-नागपूर राज्य मार्गावर आली आहेत.

मार्लेगाव, उंचाडा, पिंपरखेड, कोळी या पट्ट्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात़ त्यांना वाहतुकीसाठी हा रस्ता  सोयीचा होणार आहे़ याच कोळी-मार्लेगाव-निवघा जाण्यासाठी १०-२० मिनिटे लागतात़ मात्र रस्त्याअभावी मानवाडीफाटा-निवघा असा उलटा प्रवास करावा लागत असे़ या रस्त्याचे टेंडर झाले असून एक-दोन महिन्यांत कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली़  गायतोंड-मनाठा हा मार्गही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला़ त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी-ठाकरवाडी-रावणगाव-तामसा हा मार्गही झाला़ ठाकरवाडी-सावरगाव हा मार्ग मंजुरीसाठी टाकल्याचेही त्यांनी सांगितले़ रखडलेले मार्ग मार्गी लागले तर अनेक प्रश्न सुटणार, हे निश्चित़ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. 

२०-२५ गावांना हदगाववरुन नांदेड ये-जातळणी व निवघा या मंडळातील २०-२५ गावांना हदगाववरून नांदेडला ये-जा करावी लागते़ त्यामुळे वेळ जास्त लागत असून आर्थिक भूर्दंडही बसत आहे. परंतु गेली अनेक वर्षांपासून रखडलेला कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड-निवघा रस्ता मंजूर झाला आहे़ यामुळे तळणी, निवघा, उंचेगाव, आमगव्हाण, वाकी, मरडगा, हस्तरा-बोरगाव, शिरड, पेवा, चक्री, कोहळी, साप्ती, माटाळा, कोळी, नेवरवाडी, नेवरी या गावांंना नांदेडचा प्रवास करण्यासाठी ३० कि़मी़ लांबीचा फेरा कमी होणार आहे़ तळणी-निवघा सर्कलची गावे १५-२० कि़मी़ अंतरामध्ये सरळ बामणी फाट्यावर कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड मार्गे येणार आहेत़ यामुळे या फाट्याची बाजारपेठ वाढणार आहे़ पुढील काळात रेल्वे स्टेशनचा फायदाही या गावांना निश्चितच मिळणार आहे.