शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मार्लेगाव - कोळी रस्ता मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:31 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देतळणी - निवघा सर्कलच्या गावांचा नांदेडसाठी फेरा कमी होणार

हदगाव (नांदेड ) :  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही मार्लेगाव-कोळी, नेवरी-कोळी या गावांना रस्तेच नव्हते़ त्यामुळे हदगाव तालुक्यात असूनही बाजारपेठेसाठी कळमनुरी तालुक्यातील बाळापूरला तर नांदेडला जाण्यासाठी ३० कि़मी़ जादा अंतर कापून जावे लागायचे. आता मार्लेगाव-कोळी या रस्त्याला नाबार्डमधून सात कोटी रुपये मंजूर झाल्याने आडमार्गाची २५ गावे राज्य महामार्गाला जोडली जाणार आहेत, अशी माहिती आ. नागेश पाटील यांनी दिली.

उंचाडा गावाजवळील कयाधू नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये सात-आठ गावांचा संपर्क तुटतो, आता या गावांनाही या मार्गाचा चांगला उपयोग होणार आहे़ नेवरी गाव दोन समाजातील तेढसाठी राज्यात गाजले पण हा तणाव निवळत या गावालाही   रस्ते करीत मुख्य प्रवाहात आणण्यात आले.  नेवरी-कोळी रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने शेतक-यांना बाजारात येणे सोपे झाले आहे. यापूर्वी हा रस्ता चिखलात रुतलेला असायचा.  शेतातील माल हिवाळ्याशिवाय घरी आणता येत नसे़ आता मात्र दर पाच मिनिटाला घरी तर दुसºया पाच मिनिटात शेतात अशी परिस्थिती झाली. येथील अनेक शेतक-यांनी वीजजोडणी घेवून शेतामध्ये घरे बांधणे सुरू  केले आहे. गावात जनावरांना जागा नसल्याने व शेतात आता मुख्य रस्ता झाल्याने त्यांना तिथे राहणे सोयीचे झाले  आहे. असाच एक मार्ग चिंचगव्हाण-कार्ला-खरबी-केदारनाथ- तामसा असा झाल्याने आडमार्गावरील खरबी, कार्ला, चोरंबा, केदारनाथ ही गावे १०-२० मिनिटांमध्ये नांदेड-नागपूर राज्य मार्गावर आली आहेत.

मार्लेगाव, उंचाडा, पिंपरखेड, कोळी या पट्ट्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात़ त्यांना वाहतुकीसाठी हा रस्ता  सोयीचा होणार आहे़ याच कोळी-मार्लेगाव-निवघा जाण्यासाठी १०-२० मिनिटे लागतात़ मात्र रस्त्याअभावी मानवाडीफाटा-निवघा असा उलटा प्रवास करावा लागत असे़ या रस्त्याचे टेंडर झाले असून एक-दोन महिन्यांत कामालाही सुरुवात होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली़  गायतोंड-मनाठा हा मार्गही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला़ त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी-ठाकरवाडी-रावणगाव-तामसा हा मार्गही झाला़ ठाकरवाडी-सावरगाव हा मार्ग मंजुरीसाठी टाकल्याचेही त्यांनी सांगितले़ रखडलेले मार्ग मार्गी लागले तर अनेक प्रश्न सुटणार, हे निश्चित़ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. 

२०-२५ गावांना हदगाववरुन नांदेड ये-जातळणी व निवघा या मंडळातील २०-२५ गावांना हदगाववरून नांदेडला ये-जा करावी लागते़ त्यामुळे वेळ जास्त लागत असून आर्थिक भूर्दंडही बसत आहे. परंतु गेली अनेक वर्षांपासून रखडलेला कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड-निवघा रस्ता मंजूर झाला आहे़ यामुळे तळणी, निवघा, उंचेगाव, आमगव्हाण, वाकी, मरडगा, हस्तरा-बोरगाव, शिरड, पेवा, चक्री, कोहळी, साप्ती, माटाळा, कोळी, नेवरवाडी, नेवरी या गावांंना नांदेडचा प्रवास करण्यासाठी ३० कि़मी़ लांबीचा फेरा कमी होणार आहे़ तळणी-निवघा सर्कलची गावे १५-२० कि़मी़ अंतरामध्ये सरळ बामणी फाट्यावर कोळी-मार्लेगाव-पिंपरखेड मार्गे येणार आहेत़ यामुळे या फाट्याची बाजारपेठ वाढणार आहे़ पुढील काळात रेल्वे स्टेशनचा फायदाही या गावांना निश्चितच मिळणार आहे.