शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बापशेटवाडी येथे घरास आग, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:27 IST

बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

बा-हाळी : बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.मौजे बापशेटवाडी येथील शेतकरी बालाजी चंदर आल्लडवाड यांच्या घराला काल ५ रोजी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. दुपारची वेळ व कडाक्याचे ऊन असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. दुपारची वेळ असल्याने बालाजी चंदर आल्लडवाड यांचे वडील चंदर हुलाजी आल्लडवाड (वय ९०) हे घरामध्ये झोपले होते़ हे काही जणांच्या लक्षात येताच एकच धांदल उडाली़ काही लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढेपर्यंत ते गंभीर स्वरूपात भाजले होते़ त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आले़ या आगीत याच घरात बांधण्यात आलेली एक गाय व एक वगार गंभीर भाजले असून त्यांच्यावर बा-हाळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवकते यांनी उपचार केला़ या आगीमध्ये एक म्हैस दगावली असून संसारोपयोगी व शेती अवजारसह सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले़ तलाठी ए़बी़ठाकूर व मंडळ अधिकारी डी.एस.यल्लावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व सदर पंचनामा तहसील कार्यालयात दाखल केला़उन्हाळ्याच्या दिवसांत शेतकºयाचा संसार उघड्यावर पडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने याची त्वरित दखल घेऊन योग्य ती मदत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग