शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:02 IST

 तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

किनवट (नांदेड ) :  तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर आॅनलाईन नोंदणी केलेल्या १ हजार १९१ शेतकर्‍यांची तूर अद्यापही तोलाईच्या प्रतीक्षेतच आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटने नाफेडमार्फत  ७ फेब्रुवारी २०१८ पासून तूर खरेदी सुरु कली. आजपर्यंत १ हजार ३०९  शेतकर्‍यांनी ५ कोटी  ४२ लाख २ हजार ३७५  रुपये किमतीची ९ हजार ९४५.३९  क्विंटल तूर  खरेदी केली. खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून  ठेवण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी २०१८  रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत तूर खरेदीचा प्रारंभ झाला. प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये याप्रमाणे तुरीला भाव मिळू लागल्याने तूर नाफेडच्या  खरेदी केंद्रावर विकणे शेतकर्‍यांनी पसंद केले. २ हजार ५०० शेतकर्‍यांनी तूर खरेदीसाठी आॅनलाईन अर्ज केले. 

दररोज पन्नास, शंभर आॅनलाईन होतच आहेत. तूर ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था नाही. सरकारकडे पैसा नसल्याने तूर खरेदी संथगतीने करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात असल्याने शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी होणारी संकलन केंद्रावर होणारी गर्दी  व खेटे मारणे पाहता केंद्रचालक कमालीचे गोंधळात पडले आहेत. विक्रीतून मिळणार्‍या रकमेचा घरखर्च, उसनवारीची परतफेड व लेकीबाळीच्या लग्नकार्यासाठी करावी ही अपेक्षाच भंग पडली. किनवटला मोठ्या प्रमाणात तूर विक्री करु पाहणार्‍या शेतकर्‍यांनी आॅनलाईन  अर्ज केले, त्यांच्या  तुरीची तोलाई बाकी असतानाच बिलोली, धार्माबादला खरेदी झालेली तूर किनवट येथील वखर महामंडळाच्या गोदामात आणल्याने नांदेडच्या  गोदाम सोडून तूर किनवटला का आली? असा सवाल आहे. तूर खराब असल्याने नांदेडच्या गोदामचालकाने ती स्वीकारली नसल्याचे कळते,  मग किनवटला ती का स्वीकारली, असा सवाल आहे.  

आठ दिवसांत रक्कम मिळेलतूर खरेदीनंतर शेतकर्‍यांच्या चुकार्‍याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी सावंत (मुंबई) यांना वारंवार कळविले आहे. तशी विचारणाही केली आहे. आठ दिवसांत चुकार्‍याची रक्कम मिळेल- रवी तिरमनवार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती 

आर्थिक कोंडी  झालीतुरीचे चुकारे मिळाले तर त्या पैशातून सालगडी ठेवावे व इतर खर्च भागवावा, अशी आशा होती. पण तूर विक्री करुन महिना लोटला तरी तुरीचे पैसे  न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली- सुभाष मुंडे, शेतकरी आंदबोरी (चि)

पैसे देण्याची मानसिकता नाहीतूर खरेदी  केल्यानंतर तुरीचे पैसे शेतकर्‍यांना वेळीच म्हणजे सात दिवसांच्या आत मिळायला पाहिजे होते. पण सरकारची वेळीच पैसे देण्याची मानसिकता नाही. चोहीकडून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. लग्नसराईचे दिवस अन् हक्काचे पैसे  मिळण्यास विलंब होत असून कोणाकडे न्याय मागावा? - अनिल क-हाळे पाटील, सभापती कृउबा समिती किनवट

वेळीच तुरीचे चुकारे  द्यावे

अत्यल्प पावसामुळे कोणत्याच पिकाचे उत्पन्न समाधानकारक नाही. तूर विक्रीपोटीची रक्कम वेळीच हातात मिळेल, दैनंदिन व्यवहार चालविण्यात मदत होईल असे वाटले; पण रक्कम काही हातात पडली नाही. शासनाने वेळीच तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना द्यावे- गोपाळ पाटील इस्लापूरकर.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाNandedनांदेडagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र