शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

नांदेड : पाणीप्रश्नाबाबत मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाºया काळात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. ...

ठळक मुद्देमराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत मुद्देसूद विवेचन जायकवाडीवर पैठण ते धर्माबाद दरम्यान बारा बंधारेमराठवाड्यातील हक्काच्या पाण्याची नोंद झाली पाहिजे

नांदेड : पाणीप्रश्नाबाबत मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाºया काळात मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच पाणीप्रश्नाबाबत मराठवाडाभर जनजागरण करुन यासंबंधी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवण्याचा निर्धार बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आला.‘मराठवाड्यातील सिंचन आणि पाणीप्रश्न’ या विषयावर माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या पुढाकाराने येथील पीपल्स महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांच्यासह आ. डी.पी. सावंत, माजी आ. डी. आर. देशमुख, शंतनू डोईफोडे, राष्ट्रवादीचे सुनील कदम, इंजि. द. मा. रेड्डी, इंजि. व्यंकटराव आढाव, इंजि. बसवते, उत्तमराव सूर्यवंशी, भाऊराव मोरे, बाबूराव रोशनगावकर, डॉ. बालाजी कोंपलवार, प्रा. एस. एस. पाटील, कदम गुरुजी, इंजि. उन्हाळे, उमाकांत जोशी आदींसह विविध संस्था-संघटनांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.बैठकीच्या प्रारंभी जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत मुद्देसूद विवेचन केले. ज्या ठिकाणी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिकडेच पाणी घेवून जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत मराठवाडा जोपर्यंत पाणीप्रश्नाबाबत उठाव करणार नाही, तोपर्यंत काहीही होणार नसल्याचे सांगत जनतेच्या उदासीनतेमुळे पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले. जायकवाडीवर पैठण ते धर्माबाद दरम्यान बारा बंधारे आहेत. हे बंधारे भरुन मिळाले तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न निकाली लागेल. मात्र तसे होताना दिसत नसल्यानेच आता आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.आ. डी. पी. सावंत यांनी सध्या सुरू असलेल्या एकात्मिक जल आराखड्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. या आराखड्यात मराठवाड्यातील हक्काच्या पाण्याची नोंद झाली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याची गरज व्यक्त केली. एकीकडे पायाभूत सुविधा तयार करायला सांगताना दुसरीकडे पाणी कपातीचे धोरण सरकार राबवित असल्याचे सांगत याप्रश्नी समितीकडून मराठवाडास्तरावर होणा-या लोकचळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचा शब्द आ. सावंत यांनी दिला. जायकवाडी प्रकल्पावर कुठलीही परवानगी न घेता दहा धरणे बांधल्याचे सांगत याप्रकरणी समितीच्या वतीने न्यायालयात दाद मागू, असे माजी आ. डी. आर. देशमुख यांनी सांगितले. उमाकांत जोशी, डॉ. बालाजी कोंपलवार, डॉ. सुनील कदम, प्रा. एस.एस. पाटील यांच्यासह इतर पदाधिका-यांनी भूमिका मांडली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पाणीप्रश्नाबाबत जनजागरण करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

  • मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अराजकीय संघटन उभे करुन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ही समिती फक्त पाणीप्रश्नासाठी लढेल, असे स्पष्ट करतानाच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन प्रतिनिधी या समितीत घेण्यात येतील. याबरोबरच जिल्ह्या-जिल्ह्यांतील पेन्शनर्स असोसिएशनला समितीसोबत जोडण्यात येईल. ३० जणांची संयोजन समिती नियुक्त करुन संघटन सशक्त तसेच व्यापक करण्यासाठी येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण