शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:17 IST

पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद यांचे आवाहन काँग्रेसच्या पाठीशी रहा, हैदराबादी नेत्याला भुलू नका

नांदेड : पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पराभवाचे प्रमुख ध्येय समोर ठेवून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. बॅरिस्टर ओवेसींची वंचित आघाडी ही भाजपा सरकारलाच मदत करण्यासाठी उभी असल्याचे सांगत या हैदराबादी नेत्यालाही थारा देऊ नका, असे ते म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. आझाद यांनी बुधवारी शहरातील पीरबुºहाणनगर आणि देगलूर नाका येथे प्रचारसभा घेतल्या. यावेळी मंचावर आ. डी.पी. सावंत, मालेगावचे आ. असिफ शेख, माजी महापौर अब्दुल सत्तार, सभापती फारुख अली खान, माजी सभापती मसूद खान, माजी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, अ‍ॅड. बारी सिद्दीकी, अ‍ॅड. निलेश पावडे, शमीम अब्दुल्ला, इब्राहीम इनामदार, तौफीक साब आदींची उपस्थिती होती.कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे राजकारण जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. निष्कलंक चारित्र्याचा धनी असलेल्या या नेत्याने आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जोपासली. तीच विचारधारा खा. अशोकराव चव्हाण पुढे घेवून जात असल्याने खा. चव्हाणांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील साडेचार वर्र्षात केवळ धर्मांधतेचे राजकारण केले. मुस्लिमधर्मीयांना जाणीवपूर्वक हीन वागणूक दिली. तसेच या समाजबांधवांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरही गदा आणली. याच सरकारने तीन तलाक सारखा अत्यंत चुकीचा कायदा आणला. या कायद्याविरुद्ध काँग्रेसच्या वतीने संसदेत आम्ही आवाज उठविला. पूर्वी या देशात सहिष्णुतेचे वातावरण होते. काँग्रेसच्या विचारधारेमुळे अठरापगड जातीत आपलेपणा होता. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने या विचारधारेवरच हल्ला चढविला आहे. खा. असोद्दीन ओवेसी सारखी मंडळीही धर्मा-धर्मात तेढ पसरवून एक प्रकारे भाजपाला मदत करण्याचेच काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाबरोबरच ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.राहुल गांधी यांची धोरणे स्पष्ट आहेत. देशाला विकासाकडे घेवून जाणारे युवा नेतृत्व उभे राहिले आहे. अशावेळी काँग्रेसला बळकटी दिल्यास आपले उद्याचे भविष्य उज्ज्वल राहील, असा विश्वासही गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून उपस्थितांना दिला.मतविभाजनाचा भाजपाला फायदा नकोसर्वसामान्य अल्पसंख्याक समाजाचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजपाला सत्तेबाहेर खेचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. आपली खरी लढाई फक्त धर्मांध भाजपा सरकारशी आहे. त्यामुळे ही लढाई लढताना धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपाला मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा