शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

धक्कादायक ! वाळू माफियाकडून शेतकऱ्याची कोयत्याने गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:55 IST

शेतकऱ्याने पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे. 

हदगाव: तालुक्यातील ऊंचाडा गावातील कयादु नदीच्या पात्रानजीक शेती असलेल्या एका शेतकऱ्याची वाळू माफियाने कोयत्याने गळा चिरून निर्घुण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजे दरम्यान घडली. शिवाजी धोंडबाराव कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कदम यांनी पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी धोंडबाराव कदम (ऊमरकर) यांचे कयादु नदीकाठी तीन एकर शेती आहे. यामध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. नदीला पाणी असल्याने शेतात पाणीपाळी देणे सुरू आहे. मात्र या शेतातून मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक करण्यात येते. पाणी दिल्याने शेत चिखलमय झाल्याने येथून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याच्या रागातून आज सकाळी ८:०० वाजता त्र्यंबक प्रभाकर चव्हाण (२८) याने शेतात पाणी का सोडतो असा विचारत कदम यांच्या मानेवर वार केला. कोयत्याचा मार लागताच शिवाजी किंचाळला त्यांचे वडील शेतातच होते. त्यांनी शिवाजीकडे धाव घेताच आरोपी फरार झाला. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने शिवाजी याचा तत्काळ मृत्यू झाला. 

दरम्यान, आरोपी त्र्यंबक चव्हाण यास एका वाळु ट्रक्टरमागे २००रु मिळत असून या भागातील वाळू माफियांना पोलीस व महसुल विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी बीट जमादार शाम वडजे यांना निलंबित करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीsandवाळू