शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:05 AM

राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़

ठळक मुद्देकर्जमाफी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली़ आॅनलाईन अर्ज आणि विविध नियमांमुळे सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागला़ परंतु, कर्जमाफी झाल्याचा तसेच किती रक्कम झाली आदी सविस्तर माहिती वैयक्तिक मिळू लागल्याने शेतक-यांनी पारदर्शक कर्जमाफीबदल समाधान व्यक्त केले़येणा-या काळात सरसकट कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा आजही शेतक-यांना आहे़ त्यामुळेच वनटाईम सेटलमेंट योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ३५ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९८ लाख रूपये जमा केले आहेत़ तर दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतक-यांची संख्या २५ हजारांवर असून आजपर्यंत यातील मोजक्याच शेतक-यांनी ओटीएसचा लाभ घेतला आहे़ जवळपास २५ हजार ५९६ शेतक-यांकडे दीड लाखांपेक्षा अधिक असलेली रक्कम २२७ कोटी ८५ लाख रूपये आहे़आजपर्यंत किती शेतक-यांनी वनटाईम सेटलमेंट केली याचा आकडा जिल्हा अग्रणी बँकेकडे उपलब्ध नाही़ ओटीएससाठी शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांदेखील उदासीन असल्याचे चित्र आहे़---बळीराजाला सरसकट कर्जमाफीची अपेक्षा़़़एसबीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मेळावे घेवून त्यांना ओटीएस योजनेतून दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम भरून कर्जमाफीतील दीड लाख रूपयांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले़ एसबीआयच्या २१ हजार ६४३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३१० शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ घेतला आहे़ शेतकऱ्यांनी ३़९१ कोटी रूपये जमा केले़ शेतकरी अधूनमधून बँकांमध्ये चकरा मारून कर्जमाफीची माहिती घेत आहेत़ तर येणाऱ्यां लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी अपेक्षा बहुतांश शेतकऱ्यांना असल्याने सेटलमेंटकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत़---शेतकऱ्यांना आवाहनशासनाच्या वतीने वनटाईम सेटलमेंटसाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे़ येत्या ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा लाभ घेता येईल़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या माध्यमातून दीड लाखांवरील रक्कम भरून दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीbankबँक