शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रबीचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:27 IST

किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ 

ठळक मुद्दे१७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

नांदेड : नैसर्गिक आपत्तीद्वारे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेचा लाखो शेतकरी दरवर्षी फायदा घेत आहेत़ परंतु, यंदाच्या रबी हंगामातील पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात केवळ १६ हजार ९३० शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत़ 

राज्यात रबी हंगाम २०१९ -२० या वर्षाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़ प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत मंगळवार, ३१ डिसेंबर असून शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचे काम सध्या सुरू आहे़  

जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ९३० शेतकऱ्यांनी रबीच्या पिकांसाठी विमा भरला आहे़ यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यातील ८ हजार ६६२ शेतकऱ्यांनी पीकविमा भराला आहे़ त्यापाठोपाठ नायगाव तालुक्यातील ४ हजार ७१५ शेतकऱ्यांनी, देगलूर तालुक्यातील २ हजार ९२ शेतकऱ्यांनी, बिलोली - ७२५, हदगाव - ३१८, अर्धापूर - १५३, नांदेड तालुक्यातील ११४, कंधार तालुक्यातील ८५, लोहा - ३१, धर्माबाद - ११, मुदखेड - ८, हिमायतनगर तालुक्यातील ८ शेतकऱ्यांनी, भोकर तालुक्यातील ६ तर किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ सदर योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येत आहे़ रबी हंगामातील पिकासाठी दीड टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. 

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे़ पीक- गहू बागायती- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ५२५ रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २६ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३९० रुपये, विमा लागू असलेले तालुके बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व महसूल मंडळ), अधिसूचना तालुकास्तरीय- देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३६० रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागू असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी- मार्फत राबविण्यात येत आहे़ दरम्यान, विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी विविध बँकांसमोर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे़ त्यामुळे उर्वरित दिवसात विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे कृषि विभागाने सांगितले़ 

अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावारबी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बागायती गहू, ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागू आहे.रबी हंगामातील लागू असलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवावा़ या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आऱ बी़ चलवदे यांनी केले आहे़ 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती