शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांनो, आता आणखी ‘रिस्क’ नको;बाजारात कापसाला उच्चांकी भाव,विक्रीस आणण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 17:32 IST

सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात रुई गाठींची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कमालीची तेजी आहे.

नांदेड : चांगल्या दर्जाच्या कापसाला सध्या १० हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे. हा भाव उच्चांकी ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आणखी जोखीम (रिस्क) न पत्करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा, असे सल्लावजा आवाहन कॉटन काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) केले आहे.

सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही (मुंबई) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात रुई गाठींची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कमालीची तेजी आहे. सध्या साडेदहा हजारांपर्यंत भाव गेला आहे; परंतु हा भाव उच्चांकी वाटतो आहे. यापेक्षा आणखी भाव वाढेल अशी शक्यता नाही. एखादवेळी वाढलाच तर तो किंचित स्वरूपाचा राहील. यापेक्षा अधिक भाव दिला गेल्यास कापड मिल मालकांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे आणखी भाव वाढणार नाही. मात्र, एखादवेळी कमी होण्याची शक्यता आहे. भाव कमी झाला तरी हमी भावापेक्षा तो कितीतरी हजारांनी अधिक असल्याने शेतकऱ्यांचे निश्चितच नुकसान होणार नाही. ते पाहता शेतकऱ्यांनी आणखी दरवाढीची प्रतीक्षा न करता आणि कोणतीही जोखीम न पत्करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला सीसीआयने दिला आहे.

आणखी ४५ टक्के कापूस घरातचआतापर्यंत ५५ टक्के कापूस विक्रीसाठी आला आहे. आणखी ४५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. यावर्षी राज्यात ४ कोटी क्विंटल कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यापैकी अडीच कोटी क्विंटल कापूस बाजारात आला आहे. आणखी दीड कोटी क्विंटल कापसाची विक्री होणे बाकी आहे. या खरीप हंगामात उशिरा पेरणी झाल्याने कापसाचा हंगाम एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

कापसाचा पेरा २० टक्क्यांनी वाढणारगेल्या हंगामात सोयाबीनसह इतर पिकांनीही धोका दिला आहे. त्याला निसर्ग व किडींचे आक्रमण कारणीभूत ठरले आहे. अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कापसाची कमी लागवड केली आणि नेमका याच वर्षी कापसाला दहा हजारांच्या पुढे भाव मिळाला. ते पाहता पुढील हंगामात राज्यात कापसाचा पेरा किमान २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस. के. पाणिग्रही यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी