शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

समान मावेजासाठी शेतकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:19 IST

दरेसरसम-आंदेगाव साठवण तलावाचे दार बंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ परंतु, सदर तलावासाठी संपादित जमिनीच्या मोबदला वाटपात समानता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून समान मावेजा द्यावा, यासाठी शेतकरी एकवटले आहेत़ त्यामुळे अकरा वर्षांपासून सुरू असलेला तलाव पूर्णत्वास जाण्यास पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देअकरा वर्षांपासून भिजत घोंगडे दरेसरसम-आंदेगाव साठवण तलावाच्या कामात पुन्हा अडथळे

हिमायतनगर : दरेसरसम-आंदेगाव साठवण तलावाचे दार बंद करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ परंतु, सदर तलावासाठी संपादित जमिनीच्या मोबदला वाटपात समानता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून समान मावेजा द्यावा, यासाठी शेतकरी एकवटले आहेत़ त्यामुळे अकरा वर्षांपासून सुरू असलेला तलाव पूर्णत्वास जाण्यास पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे़दरेसरसम - टेंभी साठवण तलावाचे काम पूर्णत्वास येवून अनेक वर्षे लाटली़ केवळ तोंडावरील बांध कोंडण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना या शिवारातील शेतक-यांनी जमीन संपादनामध्ये आर्थिक मावेजा समान मिळाला नसल्याने आंदोलने करुन तलावाचे काम बंद पाडले होते़ सन २०१७ मध्ये राजकीय हस्तक्षेप व पाटबंधारे विभागाकडून तोडगा काढल्याने एप्रिल - मे २०१७ पासून तलावाचे बांध टाकण्याचे काम सुरु करण्यात आले़ परंतु, पुन्हा यासाठी संपादित केलेल्या अनेक शेतक-यांना मावेजा मिळाला नाही़ज्या शेतकºयांना मावेजा मिळाला आहे़ त्यांच्या मावेजामध्येही मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने या भागातील शेकडो शेतकºयांनी सर्वांच्या जमिनीला समान मोबदला द्यावा अन्यथा तलावाचे काम बंद पाडू, वेळप्रसंगी हक्काच्या मोबदल्यासाठी कोणत्याही क्षणी आत्मदहन करू असा इशारा दिल्याने साठवण तलाव पूर्ण होण्यास आडकाठी निर्माण झाली आहे.हिमायतनगर तालुक्यात सिंचनासाठी पाणी नाही तसेच हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात़ यासाठी दीड दशकांपूर्वी शासनाकडून आंदेगाव, दरेसरसम - पवना, टेंभीमध्ये जंगलाच्या पायथ्याशी साठवण तलाव मंजूर झाला. त्यासाठी २००७ मध्ये जवळपास सव्वाशे शेतक-यांची जमीन संपादित करण्यात आली़ परंतु शासनाने त्यापैकी २५ लोकांना नवीन दर म्हणजे ९़५ लाख आणि १०० शेतक-यांना केवळ १़५ लाख एकरी असा मावेजा दिला आहे.शासनाच्या दुटप्पी भूमिकेस विरोध दर्शवत शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली़ सर्वांना समान मावेजा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरु केला आहे. तलावाच्या निर्मितीनंतर या भागातील दरेसरसम, पवना, भिशाचीवाडी, आंदेगाव, सरसमसह अनेक गावांतील हजारो एकर जमीन सिंचनाखाली येवून उन्हाळ्यातील पाणी टंचाईपासून मुक्ती मिळणार आहे.शासनाकडून समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रश्न मार्गी लागत नाही़ परंतु, आंदेगाव, टेंभी, सरसम, पवना, दरेसरसम, भिशाचीवाडी या गावांतील शेतक-यांनी पुढाकार घेऊन मोर्चे आंदोलन केले. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींची भेट घेतली़ मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही़बंद पडलेले काम सुरू : काही शेतक-यांना ९़५ तर काहींना १़५ लाख

  • माजी खा. सुभाष वानखेड यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात शेतक-यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेऊन बंद पडलेले तलावाचे काम सुरु केले़ परंतु, अनेक शेतक-यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देणे बाकी आहे़ तर काही शेतकºयांना साडेनऊ लाख रूपये मावेजा दिला आणि शंभराहून अधिक शेतक-यांना केवळ दीड लाख रूपये मावेजा दिला़
  • तलावासाठी संपादित झालेली जमीन सर्वांची सारखीच असताना शेतक-यांना देण्यात येणा-या मोबदल्यात भेदभाव का केला जातोय? तसेच कमी - अधिक मावेजा देऊन भूसंपादन खात्याचे अधिकारी हेराफेरी करण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा संतप्त सवाल मावेजापासून वंचित तसेच कमी मावेजा मिळालेल्या या भागातील शेतक-यांनी उपस्थित केला आहे.
  • शेतक-यांचा तलावाला विरोध नाही, परंतु मावेजामध्ये भेदभाव करू नये, सर्वांना समान मोबदला द्यावा, अन्यथा तलावाचे काम बंद पाडू़ वेळप्रसंगी आत्मदहन करू असा इशारा शेतक-यांनी दिला आहे़ दरम्यान, या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून शेतक-यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर श्रीराम यलकेवाड, गणेश यदमवाड, परमेश्वर निळकंठे, सरस्वताबाई यदमवाड, गोविंद यलकेवाड, छाया रेड्डेवाड, पेंटुबाई अंचतवाड, परमेश्वर गोसलवाड, रामदास चव्हाण, दिलीप चव्हाण, मारोती राठोड, रंगा राऊत, विशवनाथ सावते, रामराव जाधव, जनाबाई नरवाडे, विठ्ठल पोतरे, लक्ष्मण गंदेवाड, अनिता अन्नमवाड, यमुनाबाई यदमवाड यांच्यासह शेकडो शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीfundsनिधीDamधरण