शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतकऱ्याने उभ्या तुरीत सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:49 IST

मुखेड तालुक्यात सततच्या तीन वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतक-यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

मुखेड : मुखेड तालुक्यात सततच्या तीन वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतक-यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शिरुर द. येथील एका शेतक-याने तुरीच्या उभ्या पिकात जनावरे सोडून 'विकास साखर कारखाना'कडे ऊस ओढण्यासाठी ६० हजार रूपयाची उचल घेतली आणि पत्नीसह आपले बैल व गाडी घेऊन साखर कारखान्याला गेला आहे.शिवाजी विश्वनाथ कराळे, असे शेतक-याचे नाव असून, आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी कराळे यांची. त्यांना २ एकर माळरान जमीन. यातून कुंटुंबाची गुजराण होईना. शेवटी त्यांनी शिरुर शिवारातील मुखेड- जांब बु. राज्य मार्ग रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर कवटीकवार यांची ३० एकरच्या जवळपास जमीन ५० हजार रुपये देवून खंडगुत्ते पद्धतीने घेतली. मागील दोन वर्ष कोरडा दुष्काळात गेले. यंदा तर भयानक अवस्था आहे. शेतीसाठी कराळे यांनी ५० हजाराची बैलजोडी विकत घेतली. पेरणीसाठी ५० ते ६० हजारांचे बी-बियाणे, खत, फवारणीवर खर्च केला. शेतात ५ बॅग सोयाबीनला ८ क्विंटल उत्पन्न निघाले.१० बॅग ज्वारीला २० पोते ज्वारी झाली. उडीद २ क्विंटल, मुग २ क्विंटल झाले तर तुरीला ना फुल ना चट्टा. शेवटी कंटाळून कराळे यांनी उभ्या तुरीत जनावरे सोडली. कराळे यांच्यावर मोठे कर्ज झाले. एकूणच यासर्व बाबींना वैतागून त्यांनी लातूरच्या पुढे असलेल्या 'विकास साखर कारखाना'कडे ऊस ओढण्यासाठी ६० हजार रूपयाची उचल घेतली आणि पत्नीसह आपले बैल व गाडी घेऊन साखर कारखान्याचा मार्ग स्वीकारला. त्यांची दोन्ही मुले पुण्यास कामाला गेली आहेत.ही व्यथा एका शेतकºयाची असली तरी तालुक्यातील प्रत्येक शेतकºयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मुखेड तालुक्यात मागील तीन वर्षांत ५० च्या आसपास शेतकºयांनी कर्जबाजारी, नापीकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या नोंदी तहसीलमध्ये आहेत.

  • शिवाजी विश्वनाथ कराळे, असे शेतकºयाचे नाव असून, आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
  • संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी कराळे यांची. त्यांना २ एकर माळरान जमीन. यातून कुंटुंबाची गुजराण होईना.
  • शेवटी त्यांनी शिरुर शिवारातील मुखेड- जांब बु. राज्य मार्ग रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर कवटीकवार यांची ३० एकरच्या जवळपास जमीन ५० हजार रुपये देवून खंडगुत्ते पद्धतीने घेतली.
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा