शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:14 IST

शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़

ठळक मुद्देपैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीशेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नआम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाने वाहती राहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे़ यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकदा मागणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़नदीकाठावरील गावकºयांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली़ यंदा वरिष्ठ पातळीवर पाणी भरपूर झाल्याने इसापूर धरण ७० टक्के भरले आहे़ त्यासाठी पाणी सोडून संबंधित भागातील बंधारे भरून देण्यात यावे, आम्ही नदीकाठावरील सर्व जनता दरवर्षी पाण्यासाठी मागणी करत असतो़ परंतु कार्यालयातील अधिकारी हे तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे सांगून पाण्यासाठी आलेल्यांवर अन्याय करीत आहेत़ जेव्हा इसापूर धरण भरले की नदीकाठावरील आम्हा शेतकºयांना सावधानतेचा इशारा देवून नदीपात्रात पाणी सोडतात़ यावेळी आमच्या शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान होते़ आणि पाण्याच्या त्यांच्या काळात आम्ही पाणी मागितले की आम्हाला पाणी देता येणार नाही, असे कारण सांगितले जाते़ पाणी जास्त सोडून आमच्यावर अन्याय आणि मागण्यासाठी आले तरीही आमच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे़ ज्या लोकांचे नुकसान होत नाही, अशांना कालवे खोदून कोट्यवधींचा निधी खर्चून लाभक्षेत्रात घेवून पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून आम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे़ आम्ही शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीकर भरत असतानाही अन्याय केला जात असेल तर आम्ही सहन करणार नाही़ त्यामुळे नदीकाठावरील शेतकºयांच्या सिंचन व पाणीप्रश्नाकडे लक्ष देत शासनाने ठरविलेल्या दोन कालव्याप्रमाणे तिसरा कालवा पैनगंगा नदीस घोषित करून पाणीपाळ्याप्रमाणे नियमित पाणी देण्यात यावे, जर आगामी आठ दिवसांत पैनगंगा नदीत वारंग टाकळी येथील शेवटच्या टोकापर्यंत पाणी नाही सोडले तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल, याची सर्व जबाबदाी प्रशासनावर राहील, वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असा इशाराही देण्यात आला़सदर निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा़ राजीव सातव, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ़ नागेश पाटील, जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे़ या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, कृउबाचे सभापती गजानन तुप्तेवार, सुभाष राठोड, मदनराव पाटील, राजू पाटील भोयर, आबाराव पाटील, बळीराम देवकते, डॉ़ वानखेडे, किशनराव वानखेडे, नारायण पाटील, रामराव पाटील, विष्णु जाधव, अवधूतराव शिंदे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपwater shortageपाणीटंचाई