शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:14 IST

शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़

ठळक मुद्देपैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीशेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नआम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाने वाहती राहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे़ यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकदा मागणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़नदीकाठावरील गावकºयांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली़ यंदा वरिष्ठ पातळीवर पाणी भरपूर झाल्याने इसापूर धरण ७० टक्के भरले आहे़ त्यासाठी पाणी सोडून संबंधित भागातील बंधारे भरून देण्यात यावे, आम्ही नदीकाठावरील सर्व जनता दरवर्षी पाण्यासाठी मागणी करत असतो़ परंतु कार्यालयातील अधिकारी हे तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे सांगून पाण्यासाठी आलेल्यांवर अन्याय करीत आहेत़ जेव्हा इसापूर धरण भरले की नदीकाठावरील आम्हा शेतकºयांना सावधानतेचा इशारा देवून नदीपात्रात पाणी सोडतात़ यावेळी आमच्या शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान होते़ आणि पाण्याच्या त्यांच्या काळात आम्ही पाणी मागितले की आम्हाला पाणी देता येणार नाही, असे कारण सांगितले जाते़ पाणी जास्त सोडून आमच्यावर अन्याय आणि मागण्यासाठी आले तरीही आमच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे़ ज्या लोकांचे नुकसान होत नाही, अशांना कालवे खोदून कोट्यवधींचा निधी खर्चून लाभक्षेत्रात घेवून पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून आम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे़ आम्ही शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीकर भरत असतानाही अन्याय केला जात असेल तर आम्ही सहन करणार नाही़ त्यामुळे नदीकाठावरील शेतकºयांच्या सिंचन व पाणीप्रश्नाकडे लक्ष देत शासनाने ठरविलेल्या दोन कालव्याप्रमाणे तिसरा कालवा पैनगंगा नदीस घोषित करून पाणीपाळ्याप्रमाणे नियमित पाणी देण्यात यावे, जर आगामी आठ दिवसांत पैनगंगा नदीत वारंग टाकळी येथील शेवटच्या टोकापर्यंत पाणी नाही सोडले तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल, याची सर्व जबाबदाी प्रशासनावर राहील, वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असा इशाराही देण्यात आला़सदर निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा़ राजीव सातव, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ़ नागेश पाटील, जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे़ या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, कृउबाचे सभापती गजानन तुप्तेवार, सुभाष राठोड, मदनराव पाटील, राजू पाटील भोयर, आबाराव पाटील, बळीराम देवकते, डॉ़ वानखेडे, किशनराव वानखेडे, नारायण पाटील, रामराव पाटील, विष्णु जाधव, अवधूतराव शिंदे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपwater shortageपाणीटंचाई