शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा समाधानी; नांदेड जिल्ह्यात झाली रबीची १५६ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:20 IST

मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ

ठळक मुद्देरबी होणार लाभदायी शेतकऱ्यांमध्ये समाधानहरभरा पेरणीक्षेत्रात वाढ

नांदेड : यंदा झालेल्या पावसामुळे आणि सिंचन क्षेत्र अवलंबून असलेलय येलदरी, इसापूर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे़ आजपर्यंत जवळपास १५६ हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे़ 

मृग नक्षत्रानंतर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ त्यामुळे खरीपातील पेरण्या वेळेवर होण्यास मदत झाली़ परंतु, नंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली़ त्यातून उत्पन्न घटनार अशी स्थिती असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हाती आलेले जवळपास सर्व पीक गेली़ त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक असल्याचे दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यात रबी पेरणी क्षेत्रात यंदा दीडपट वाढ झाली आहे. 

आजघडीला नांदेड जिल्ह्यात रबी ज्वारी २८० हेक्टर वर पेरली असून त्याची टक्केवारी १०४ एवढी आहे. त्याच बरोबर ५७ टक्के गव्हाची पेरणी पुर्ण झाली आहे. रबी मक्का ८३.३६ टक्के, इतर तृण धान्य ३७९.५५ टक्के, हरभरा २५२.०९ टक्के इतर कड धान्य १५३०९ टक्के यासह तीळ, मोहरी, सुर्यफुल, जवस आदी पिकांची पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १३६७.१२ हेक्टर एवढे आहे. परंतु मुबलक प्रमाणात यंदा पाणी उपलब्ध होत असल्याची बाब लक्षात घेऊन शेतकरऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. जवळपास २ हजार ९४६ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापुढेही ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी रबी नियोजनासाठी तीन बैठका घेतल्याहोत्या. या बैठकांमध्ये सिंचन, विद्युत पुरवठा तसेच खते व बियाणे याचे नियोजन करण्यासंदर्भात संबंधीतांना वेळोवेळी सुचित केले होते. जिल्ह्यात रबीचे १ लाख ३६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना यंदा २ लाख १४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून हिरमुडलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक ठरेल, अशी अपेक्षा आहे़ 

हरभरा पेरणीक्षेत्रात वाढ; शेतकरी समाधानीयंदा रबीसाठी जवळपास सर्वच प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे़ विष्णुपूरीसह येलदरी आणि इसापूर धरणातून सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरा पेरणीत वाढ केली आहे़ ४जवळपास २५२ टक्के हरभरा पेरणी झाली आहे़ हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३ हेक्टर असताना १५७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर जवळपास ५७ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे़ थंडीत वाढ झाल्याने पिकपरिस्थतीही चांगली आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र