शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

बळीराजा समाधानी; नांदेड जिल्ह्यात झाली रबीची १५६ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:20 IST

मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ

ठळक मुद्देरबी होणार लाभदायी शेतकऱ्यांमध्ये समाधानहरभरा पेरणीक्षेत्रात वाढ

नांदेड : यंदा झालेल्या पावसामुळे आणि सिंचन क्षेत्र अवलंबून असलेलय येलदरी, इसापूर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे़ आजपर्यंत जवळपास १५६ हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे़ 

मृग नक्षत्रानंतर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ त्यामुळे खरीपातील पेरण्या वेळेवर होण्यास मदत झाली़ परंतु, नंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली़ त्यातून उत्पन्न घटनार अशी स्थिती असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हाती आलेले जवळपास सर्व पीक गेली़ त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक असल्याचे दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यात रबी पेरणी क्षेत्रात यंदा दीडपट वाढ झाली आहे. 

आजघडीला नांदेड जिल्ह्यात रबी ज्वारी २८० हेक्टर वर पेरली असून त्याची टक्केवारी १०४ एवढी आहे. त्याच बरोबर ५७ टक्के गव्हाची पेरणी पुर्ण झाली आहे. रबी मक्का ८३.३६ टक्के, इतर तृण धान्य ३७९.५५ टक्के, हरभरा २५२.०९ टक्के इतर कड धान्य १५३०९ टक्के यासह तीळ, मोहरी, सुर्यफुल, जवस आदी पिकांची पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १३६७.१२ हेक्टर एवढे आहे. परंतु मुबलक प्रमाणात यंदा पाणी उपलब्ध होत असल्याची बाब लक्षात घेऊन शेतकरऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. जवळपास २ हजार ९४६ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापुढेही ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी रबी नियोजनासाठी तीन बैठका घेतल्याहोत्या. या बैठकांमध्ये सिंचन, विद्युत पुरवठा तसेच खते व बियाणे याचे नियोजन करण्यासंदर्भात संबंधीतांना वेळोवेळी सुचित केले होते. जिल्ह्यात रबीचे १ लाख ३६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना यंदा २ लाख १४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून हिरमुडलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक ठरेल, अशी अपेक्षा आहे़ 

हरभरा पेरणीक्षेत्रात वाढ; शेतकरी समाधानीयंदा रबीसाठी जवळपास सर्वच प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे़ विष्णुपूरीसह येलदरी आणि इसापूर धरणातून सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरा पेरणीत वाढ केली आहे़ ४जवळपास २५२ टक्के हरभरा पेरणी झाली आहे़ हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३ हेक्टर असताना १५७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर जवळपास ५७ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे़ थंडीत वाढ झाल्याने पिकपरिस्थतीही चांगली आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र