शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:38 IST

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे.

अर्धापूर ( नांदेड ) : महावितरणने वीज पुरवठा तोडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अर्धापूर येथील महावितरण कार्यालयात गांधीगिरीच्या मार्गाने शेतकऱ्यांनी सहपरिवार ठिय्या आंदोलन करून महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे.

रब्बी हंगामाची पेरण्या झाल्या हवामानातील बदल, विविध अडचणींचा सामना करत कशीबशी पिके डोलत होती. गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे. शेतातील पिके कोमेजुन जात असल्याने व पिण्यासही पाणी नसल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी चिंतातुर अवस्थेत व्याकुळ झाला आहे. हाताला आलेली पिके जाऊ नये यासाठी बोअरवेल, विहीरीतील पाणी पिकांना देऊन जिवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिल्याने अखेर कोंढा येथील शेतकऱ्यांनी आज गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. 

शेतकऱ्यांनी सहपरिवार बैलगाडी, जनावरे घेऊन अर्धापूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडले. आमच्यासह जनावरांची व्यवस्था करा म्हणत जनावरे कार्यालयातच बांधली. शेती नाही तर खाल माती अशा घोषणा ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात करण्यात आल्या. वीजपुरवठा बंद करून आघाडी शासन शेतकऱ्यांना निजामाप्रमाणे वागणूक देत आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ६ तासांच्या आंदोलनाला यश आले असून महावितरणने माघार घेत विद्युत पुरवठा पूर्ववत  सुरू करण्यात आला आहे. 

आंदोलनात गुणवंत हंगरगेकर, अँड किशोर देशमुख, अँड.बि.टी.पवार, धर्मराज देशमुख, शिवाजी पवार, बालाजीराव गव्हाणे, पप्पू पाटील, प्रल्हाद इंगोले, मुन्ना कदम, राम कदम, गणेश कदम, अँड.बालाजी कदम, रामराव कदम, अशोक कदम, माधवराव कदम, पप्पू कदम यांच्यासह हजारो शेतकरी व महिलांचा सहभाग होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती