शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:38 IST

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे.

अर्धापूर ( नांदेड ) : महावितरणने वीज पुरवठा तोडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अर्धापूर येथील महावितरण कार्यालयात गांधीगिरीच्या मार्गाने शेतकऱ्यांनी सहपरिवार ठिय्या आंदोलन करून महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे.

रब्बी हंगामाची पेरण्या झाल्या हवामानातील बदल, विविध अडचणींचा सामना करत कशीबशी पिके डोलत होती. गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे. शेतातील पिके कोमेजुन जात असल्याने व पिण्यासही पाणी नसल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी चिंतातुर अवस्थेत व्याकुळ झाला आहे. हाताला आलेली पिके जाऊ नये यासाठी बोअरवेल, विहीरीतील पाणी पिकांना देऊन जिवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिल्याने अखेर कोंढा येथील शेतकऱ्यांनी आज गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. 

शेतकऱ्यांनी सहपरिवार बैलगाडी, जनावरे घेऊन अर्धापूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडले. आमच्यासह जनावरांची व्यवस्था करा म्हणत जनावरे कार्यालयातच बांधली. शेती नाही तर खाल माती अशा घोषणा ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात करण्यात आल्या. वीजपुरवठा बंद करून आघाडी शासन शेतकऱ्यांना निजामाप्रमाणे वागणूक देत आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ६ तासांच्या आंदोलनाला यश आले असून महावितरणने माघार घेत विद्युत पुरवठा पूर्ववत  सुरू करण्यात आला आहे. 

आंदोलनात गुणवंत हंगरगेकर, अँड किशोर देशमुख, अँड.बि.टी.पवार, धर्मराज देशमुख, शिवाजी पवार, बालाजीराव गव्हाणे, पप्पू पाटील, प्रल्हाद इंगोले, मुन्ना कदम, राम कदम, गणेश कदम, अँड.बालाजी कदम, रामराव कदम, अशोक कदम, माधवराव कदम, पप्पू कदम यांच्यासह हजारो शेतकरी व महिलांचा सहभाग होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती