शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:05 IST

नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्देराजकारण निघाले ढवळून : काँग्रेस-भाजप वादात सेनेचीही उडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना विधानसभा लढविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस आ. अमरनाथ राजूरकर यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलेल्या या विधानानंतर काँग्रेसबरोबरच सेना-भाजपाही आमनेसामने उभी ठाकली असून तिन्ही पक्षांतून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.विष्णूपुरी येथे झालेल्या कार्यक्रमात खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे आ. राजूरकर यांनी विधान केले. असे झाल्यास काँग्रेसची एक जागा वाढेल. सोबतच नांदेड दक्षिणचाही विकास होईल, असे विधान त्यांनी केले होते. यावर शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी काँग्रेस आमदारावर टीकेची झोड उठविली. इतकी वर्षे जिल्ह्यावर वर्चस्व असताना नांदेडचा विकास काँग्रेसला का करता आला नाही? अशी टीका त्यांनी केली. जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेवरही कॉंग्रेसची सत्ता असताना पुन्हा विकासासाठी काँग्रेस हवी, असे म्हणणे निरर्थक असल्याचे आनंद जाधव यांनी म्हटले होते.दरम्यानच्या काळात आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात मागच्यावेळी माझ्यामुळेच नांदेड दक्षिणमध्ये भाजपा उमेदवार पराभूत झाला. आता मीच भाजपाचा उमेदवार निवडून आणेन असे सांगत येत्या काळात जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढलेले दिसेल, असा दावा आ. चिखलीकर यांनी केला. या व्यक्तव्याचाही जाधव यांनी समाचार घेतला.नांदेड दक्षिणची जागा मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांमुळेच आम्ही जिंकली होती. त्यामुळे निवडून आणण्याबाबतचे फुकटचे श्रेय घेवू नये, असा टोला त्यांनी आ. चिखलीकर यांना लगावला होता.दरम्यान, उपमहापौर विनय गिरडे यांनीही या वादात उडी घेतली आहे. चिखलीकरांना टीकेचे लक्ष्य करीत मनपा निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर भाजपाची जबाबदारी होती, ते ८१ पैकी केवळ ६ जागा निवडणूक आणू शकले. त्यांना स्वत:च्या पुतण्याला मनपा निवडणुकीत विजयी करता आले नाही. ते इतरांना पराभूत किंवा विजयी कसे करणार ? असा सवाल गिरडे पाटील यांनी केला आहे.राज्यात जितके पक्ष आहेत ते सर्व पक्ष फिरून झाले आहेत. २०१९ पर्यंत कंधार-लोह्याचे हे आमदार भाजपमध्ये तरी राहतील काय ? असा प्रश्नही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.---नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीत मोठी चुरस होती. येथून शिवसेना निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाली होती. त्यामुळेच येवू घातलेल्या निवडणुकीसाठी या मतदारसंघावर प्रमुख पक्षांचा डोळा आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसने गुगली टाकल्यानंतर नांदेड-दक्षिणमधील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेसने खा. चव्हाण यांचे नाव घेवून विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या बरोबरच पक्षांतर्गत इच्छुकांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणAmara Rajurakarअमर राजूरकर