शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:57 IST

विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़

ठळक मुद्देतीन वर्षापासून नांदेड दुसऱ्या क्रमांकावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३़४ टक्क्यांनी लागला निकाल कमी

नांदेड : विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़बारावीच्या निकालाची घसरण कमी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे़ मागील काही वर्षात निकालाचा आलेख उंचावला होता़ मात्र तो आता खाली आल्याचे दिसून येत आहे़ यामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते़ विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हीची ग्रुपींग होईल एवढेच ध्येय समोर ठेवून अभ्यास करतात़ या विद्यार्थ्यांची एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्स तयारीकडे अधिक लक्ष असते़ एकीकडे ग्रुपींग करण्यासाठी बोर्डाची तयारी करणे तर दुसरीकडे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर अधिक भर देणे, हा प्रकार सुरू झाला असल्याचे विद्यार्थी समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़नांदेड जिल्हा दुस-या क्रमांकावरजिल्ह्याचा निकाल यंदा ८६़२० टक्के लागला असून ८२़६३ टक्के मुलांनी तर ९०़८६ टक्के मुलींनी बाजी मारली आहे़ जिल्ह्यातून ३६ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३६ हजार ४४ जणांनी परीक्षा दिली होती़ त्यामध्ये ३१ हजार ७० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ २०१६ मध्ये ८४़९९ टक्के, २०१७ मध्ये ८८़५४ टक्के, २०१८ मध्ये ८९़३४ टक्के निकाल लागला होता़ यावर्षी मात्र ८६़२० टक्क्यावरच समाधान मानावे लागले़ निकालाचा हा आलेख गत दोन वर्षापेक्षा खाली आला आहे़ लातूर विभागात नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे येतात़ मागील तीन वर्षाची दुस-या क्रमांकाची परंपार यावर्षी सुद्धा नांदेड जिल्हा विभागाने राखली़ यंदा शंभर टक्के निकाल लागणा-या महाविद्यालयांची संख्याही कमी झाली आहे़ जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही नगण्य आहे़ त्यामुळे शंभर टक्के निकालाचे यश म्हणावे तेवढे समाधान देणारे नाही़ नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल नीट व जेईईकडे वाढल्याने विद्यार्थी बारावीचा अभ्यास गांभिर्याने करताना दिसत नाहीत़ अनेक विद्यार्थी नावालाच महाविद्यालयात प्रवेश घेतात़ काही महाविद्यालयात तासिका होत नाहीत़ केवळ प्रात्यक्षिक परीक्षा व नंतर मुख्य परीेक्षेची तयारी करून घेतात़ नीट परीक्षेसाठी वेळ राखून बारावीचा अभ्यास केला जात असल्यानेच निकालात घट झाली आहे़

टॅग्स :NandedनांदेडHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी