शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:57 IST

विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़

ठळक मुद्देतीन वर्षापासून नांदेड दुसऱ्या क्रमांकावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३़४ टक्क्यांनी लागला निकाल कमी

नांदेड : विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़बारावीच्या निकालाची घसरण कमी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे़ मागील काही वर्षात निकालाचा आलेख उंचावला होता़ मात्र तो आता खाली आल्याचे दिसून येत आहे़ यामागे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा असल्याचे दिसून येते़ विज्ञान शाखेचे विद्यार्थी पीसीबी अथवा पीसीएम या दोन्हीची ग्रुपींग होईल एवढेच ध्येय समोर ठेवून अभ्यास करतात़ या विद्यार्थ्यांची एनईईटी व जेईई मेन अ‍ॅडव्हॉन्स तयारीकडे अधिक लक्ष असते़ एकीकडे ग्रुपींग करण्यासाठी बोर्डाची तयारी करणे तर दुसरीकडे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनसीईआरटी अभ्यासक्रमावर अधिक भर देणे, हा प्रकार सुरू झाला असल्याचे विद्यार्थी समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़नांदेड जिल्हा दुस-या क्रमांकावरजिल्ह्याचा निकाल यंदा ८६़२० टक्के लागला असून ८२़६३ टक्के मुलांनी तर ९०़८६ टक्के मुलींनी बाजी मारली आहे़ जिल्ह्यातून ३६ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३६ हजार ४४ जणांनी परीक्षा दिली होती़ त्यामध्ये ३१ हजार ७० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ २०१६ मध्ये ८४़९९ टक्के, २०१७ मध्ये ८८़५४ टक्के, २०१८ मध्ये ८९़३४ टक्के निकाल लागला होता़ यावर्षी मात्र ८६़२० टक्क्यावरच समाधान मानावे लागले़ निकालाचा हा आलेख गत दोन वर्षापेक्षा खाली आला आहे़ लातूर विभागात नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे येतात़ मागील तीन वर्षाची दुस-या क्रमांकाची परंपार यावर्षी सुद्धा नांदेड जिल्हा विभागाने राखली़ यंदा शंभर टक्के निकाल लागणा-या महाविद्यालयांची संख्याही कमी झाली आहे़ जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही नगण्य आहे़ त्यामुळे शंभर टक्के निकालाचे यश म्हणावे तेवढे समाधान देणारे नाही़ नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल नीट व जेईईकडे वाढल्याने विद्यार्थी बारावीचा अभ्यास गांभिर्याने करताना दिसत नाहीत़ अनेक विद्यार्थी नावालाच महाविद्यालयात प्रवेश घेतात़ काही महाविद्यालयात तासिका होत नाहीत़ केवळ प्रात्यक्षिक परीक्षा व नंतर मुख्य परीेक्षेची तयारी करून घेतात़ नीट परीक्षेसाठी वेळ राखून बारावीचा अभ्यास केला जात असल्यानेच निकालात घट झाली आहे़

टॅग्स :NandedनांदेडHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी