शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:37 IST

स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ कर्तृव्यदक्षता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि पक्षनिष्ठा या बाबी शंकररावांकडून शिकण्यासारख्या होत्या़ त्यामुळेच आजही राज्यभरातील कार्यकर्ते त्यांचे आवर्जुन स्मरण करतात़ अशा भावना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केल्या़

ठळक मुद्देशंकरराव चव्हाण यांची जयंती : अशोकरावांनी व्यक्त केली भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ कर्तृव्यदक्षता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि पक्षनिष्ठा या बाबी शंकररावांकडून शिकण्यासारख्या होत्या़ त्यामुळेच आजही राज्यभरातील कार्यकर्ते त्यांचे आवर्जुन स्मरण करतात़ अशा भावना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केल्या़शंकरराव चव्हाण यांची शनिवारी ९८ वी जयंती साजरी होत आहेत़ जयंतीच्या पूर्वसंध्येला खा़चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मराठवाड्याच्या पाटबंधारे विकासाचा इतिहास ही शंकररावांच्या कर्तृत्वाची मालिका आहे़ मानार, येलदरी, सिद्धेश्वर, जायकवाडी, मांजरा यासारखे कितीतरी प्रकल्प त्यांच्यामुळे पूर्णत्वास आले़ या प्रकल्पांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करायचे़ नांदेडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बागायतीचा अनुभव नव्हता़ मात्र शंकररावांच्या नेतृत्वाखाली सिंचनाची चळवळ उभी राहिली आणि हा परिसर झपाट्याने बदलला़शंकरराव पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले़ पक्षानेही त्यांच्यावर तेवढाच विश्वास टाकत अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविल्या आणि नेतृत्वाने सोपविलेल्या जबाबदाºया नेतृत्वावर विश्वास टाकत तितक्याच निष्ठेने शंकररावांनी पार पाडल्या़ कार्यकर्त्यांसोबत आपले नाते कसे असावे याचाही पाठ त्यांनी घालून दिला़ राज्यभरात त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले होते़ त्यातील अनेकांसोबत त्यांचे वैयक्तिक पातळीवर संबंध होते़ अगदी कुटूंबाप्रमाणे ते कार्यकर्त्यांशी ख्याली-खुशाली विचारायचे़ स्वभावाने कणखर असले तरी तितक्याच मायेने ते कार्यकर्त्यांवर प्रेम करायचे़ आणि त्यामुळेच राज्यभरातील कार्यकर्ते आज त्यांचे स्मरण करत असताना दिसतात़नांदेड महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्सवर कारवाईचा निर्णय घेतला आहे़ या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांना शंकररावांच्या जयंतीनिमित्ताने अनधिकृत बॅनर्स लावू नका असे आवाहन केले होते़ आज शहरात पाहिले असता कार्यकर्त्यांनी या सूचनेचे पालन केल्याचे दिसून आले़ ही शंकररावांवरील निष्ठा, आत्मीयतावच असल्याचेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले़लोकांचे चव्हाण कुटुंबियावर प्रेम आहे़ नांदेडसह या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे़ या परिसराच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने यापुढील काळातही कार्यरत राहून त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, असा शब्दही खा़अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिला़---नवीन मोंढा मैदानावर आज महारक्तदान शिबीरमाजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी सकाळी ९ वाजता नवा मोंढा मैदानावर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ त्याचबरोबर जिल्हाभरात शैक्षणिक संस्था, कार्यालये येथे कार्यक्रम होणार आहेत़युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होईल़ अध्यक्षस्थानी आ. अमिता चव्हाण या राहणार आहेत़ शारदा भवन शिक्षण संस्था आयटीएम कॉलेज व कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्था, चिकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएममध्ये दुपारी २ वाजता खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण