शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नांदेड जि़ प क़र्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:26 IST

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

ठळक मुद्देप्रशासनाची कासवगती जिल्हा परिषदेतील वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ७ जूनपर्यंत पूर्ण होणार का ?

भारत दाढेल।नांदेड : जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे़ ज्यामध्ये १२ एप्रिल या तारखेपासून ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित केलेले आहे़ त्यानंतर वेगवेगळ्या कार्यवाहीचे तारीखवार टप्पेदेखील निश्चित केले आहेत़ यामध्ये १६ ते २५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदलीची कार्यवाही पार पाडावयाची होती़ दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकेची आचारसंहिता लागू होती़ निवडणूक आचारसंहितेच्या काळात बदल्यांची कार्यवाही करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही़ त्यामुळे या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़दरम्यान, जिल्हा परिषदेतील एकुण १३ हजार कर्मचाºयांपैकी ८ हजार ५०० शिक्षक संवर्गात येतात़ शिक्षक संवर्गातील बदल्या वगळून उर्वरित वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्यामुळे पुढील दहा दिवसात कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेला या बदल्या कराव्या लागणार आहेत़ २ हजारांवर परिचारिक, ४५९ कनिष्ठ लिपीक, १४३ वरिष्ठ लिपीक, २४ कक्ष अधिकारी, १ हजार ८६ शिपाई, ७९ शिपाई आदी कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत़शिपाई पदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु मागील २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ समुपदेशन पद्धतीने बदल्या न करता काही पदाधिका-यांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़ जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचा-यांना एकाच विभागात पाच वर्षे काम करता येत नाही़ मात्र जिल्हा परिषद मुख्यालयात अनेक वर्षापासून एकाच विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यांच्या बदल्यासुद्धा शासन नियमानुसार होणे गरजेचे आहे़ परंतु असे होत नाही़ या बदल्यांच्या संदर्भात अनेकदा पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही़यावर्षी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांच्या बदल्या न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि़ पक़र्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी दिला आहे़परिचर, वाहनचालकांच्या बदल्या रखडल्या

  • परिचर, वाहनचालक यांच्या बदल्याही गत पाच वर्षांपासून झाल्या नाहीत़ वाहनचालकांच्या बदल्या या विनंतीनुसार करण्यात येतात़ मात्र जिल्हा पदिषदेने या बदल्यांची प्रक्रिया राबवलीच नाही़ त्यामुळे अनेक वर्षांपासून किनवट, माहूर सारख्या ठिकाणी वाहनचालक आपली सेवा बजावत आहेत़ या वाहनचालकांनी वेळा बदलीसाठी विनंती केली़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शासनाने बदली प्रकियेसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ आजच हे पत्र मिळाले आहे़ पुढील दोन, तीन दिवसांत बदल्यांच्या संदर्भात नियोजन केले जाईल असे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी सांगितले़
  • ग्रामसेवकांची संख्या १ हजारांवर असून १३८ ग्रामविकास अधिकारी आहेत़ इतर जिल्ह्यात बदलीची पूर्वतयारी झाली आहे़ नांदेड जिल्हा परिषदेने मात्र अद्याप पात्रता यादीच तयार केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शिपाईपदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ काही पदाधिकाºयांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या केल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़
  • मागील काही वर्षांपासून बदल्यांचा घोळ सुरू आहे़ यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या उपस्थितीत बदल्या झाल्या तरच त्या पारदर्शी होतील, असे ग्रामसेवक संघटनेचे मधुकर मोंगल यांनी सांगितले़
टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली