शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नांदेड जि़ प क़र्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:26 IST

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

ठळक मुद्देप्रशासनाची कासवगती जिल्हा परिषदेतील वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ७ जूनपर्यंत पूर्ण होणार का ?

भारत दाढेल।नांदेड : जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे़जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे़ ज्यामध्ये १२ एप्रिल या तारखेपासून ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित केलेले आहे़ त्यानंतर वेगवेगळ्या कार्यवाहीचे तारीखवार टप्पेदेखील निश्चित केले आहेत़ यामध्ये १६ ते २५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदलीची कार्यवाही पार पाडावयाची होती़ दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकेची आचारसंहिता लागू होती़ निवडणूक आचारसंहितेच्या काळात बदल्यांची कार्यवाही करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही़ त्यामुळे या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़दरम्यान, जिल्हा परिषदेतील एकुण १३ हजार कर्मचाºयांपैकी ८ हजार ५०० शिक्षक संवर्गात येतात़ शिक्षक संवर्गातील बदल्या वगळून उर्वरित वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्यामुळे पुढील दहा दिवसात कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेला या बदल्या कराव्या लागणार आहेत़ २ हजारांवर परिचारिक, ४५९ कनिष्ठ लिपीक, १४३ वरिष्ठ लिपीक, २४ कक्ष अधिकारी, १ हजार ८६ शिपाई, ७९ शिपाई आदी कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत़शिपाई पदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु मागील २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ समुपदेशन पद्धतीने बदल्या न करता काही पदाधिका-यांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़ जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचा-यांना एकाच विभागात पाच वर्षे काम करता येत नाही़ मात्र जिल्हा परिषद मुख्यालयात अनेक वर्षापासून एकाच विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यांच्या बदल्यासुद्धा शासन नियमानुसार होणे गरजेचे आहे़ परंतु असे होत नाही़ या बदल्यांच्या संदर्भात अनेकदा पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही़यावर्षी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांच्या बदल्या न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि़ पक़र्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी दिला आहे़परिचर, वाहनचालकांच्या बदल्या रखडल्या

  • परिचर, वाहनचालक यांच्या बदल्याही गत पाच वर्षांपासून झाल्या नाहीत़ वाहनचालकांच्या बदल्या या विनंतीनुसार करण्यात येतात़ मात्र जिल्हा पदिषदेने या बदल्यांची प्रक्रिया राबवलीच नाही़ त्यामुळे अनेक वर्षांपासून किनवट, माहूर सारख्या ठिकाणी वाहनचालक आपली सेवा बजावत आहेत़ या वाहनचालकांनी वेळा बदलीसाठी विनंती केली़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शासनाने बदली प्रकियेसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे़ आजच हे पत्र मिळाले आहे़ पुढील दोन, तीन दिवसांत बदल्यांच्या संदर्भात नियोजन केले जाईल असे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी सांगितले़
  • ग्रामसेवकांची संख्या १ हजारांवर असून १३८ ग्रामविकास अधिकारी आहेत़ इतर जिल्ह्यात बदलीची पूर्वतयारी झाली आहे़ नांदेड जिल्हा परिषदेने मात्र अद्याप पात्रता यादीच तयार केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
  • शिपाईपदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ काही पदाधिकाºयांच्या मर्जीनुसार गतवर्षी ५० शिपायांच्या अंतर्गत बदल्या केल्या़ त्यामुळे उर्वरित शिपायांवर अन्याय झाल्याची भावना वाढली होती़
  • मागील काही वर्षांपासून बदल्यांचा घोळ सुरू आहे़ यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या उपस्थितीत बदल्या झाल्या तरच त्या पारदर्शी होतील, असे ग्रामसेवक संघटनेचे मधुकर मोंगल यांनी सांगितले़
टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदEmployeeकर्मचारीTransferबदली