शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

फाळणीचे दु:ख साहित्यातून अभिव्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:24 IST

भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.

ठळक मुद्देनरेंद्र मोहन यांचे प्रतिपादन

नांदेड : भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, रुपवेध ग्रंथालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘विभाजन : हिंदी और उर्दू कथा का विशेष संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते. स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मोहन म्हणाले, इंग्रजांनी फाळणीची प्रक्रिया नको तितक्या घाईगडबडीत घडवून आणली़ बाधित होणाºया लोकांना फाळणीबाबत अंधारात ठेवण्यात आले. इतके की, लाहोरच्या रहिवाशांना १४ आॅगस्ट १९४७ पर्यंत आपले शहर भारतात की पाकिस्तानात हे माहीत नव्हते. फाळणीमुळे झालेल्या भीषण नरसंहारात प्रेम, दया, शांती यासारखी मूल्येही भस्मसात झाली. यामुळेच कदााचित फाळणी ही एक मोठी चूक होती, असे अनेक साहित्यिकांना वाटले.सआदन हसन मंटो, इब्ने इंशा, इस्मत चुगताई, गुलजार, भीष्म सहानी आदी फाळणी प्रत्यक्षपणे भोगलेल्या कथाकारांनी आपल्या साहित्यात फाळणीचे भीषण वास्तव प्रत्ययकारीपणे उभे केले आहे. फाळणी प्रत्यक्षात न पाहिलेल्या पिढीतील लेखकांनीही या विषयावर विपुल प्रमाणात कथा लिहिल्या आहेत. यावरुन फाळणीच्या दाहक स्मृती भारतीय समाज विसरलेला नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणcultureसांस्कृतिक