शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

फाळणीचे दु:ख साहित्यातून अभिव्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:24 IST

भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.

ठळक मुद्देनरेंद्र मोहन यांचे प्रतिपादन

नांदेड : भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, रुपवेध ग्रंथालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘विभाजन : हिंदी और उर्दू कथा का विशेष संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते. स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मोहन म्हणाले, इंग्रजांनी फाळणीची प्रक्रिया नको तितक्या घाईगडबडीत घडवून आणली़ बाधित होणाºया लोकांना फाळणीबाबत अंधारात ठेवण्यात आले. इतके की, लाहोरच्या रहिवाशांना १४ आॅगस्ट १९४७ पर्यंत आपले शहर भारतात की पाकिस्तानात हे माहीत नव्हते. फाळणीमुळे झालेल्या भीषण नरसंहारात प्रेम, दया, शांती यासारखी मूल्येही भस्मसात झाली. यामुळेच कदााचित फाळणी ही एक मोठी चूक होती, असे अनेक साहित्यिकांना वाटले.सआदन हसन मंटो, इब्ने इंशा, इस्मत चुगताई, गुलजार, भीष्म सहानी आदी फाळणी प्रत्यक्षपणे भोगलेल्या कथाकारांनी आपल्या साहित्यात फाळणीचे भीषण वास्तव प्रत्ययकारीपणे उभे केले आहे. फाळणी प्रत्यक्षात न पाहिलेल्या पिढीतील लेखकांनीही या विषयावर विपुल प्रमाणात कथा लिहिल्या आहेत. यावरुन फाळणीच्या दाहक स्मृती भारतीय समाज विसरलेला नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणcultureसांस्कृतिक