शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेची होणार स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:34 IST

दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़

नांदेड : दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़ यामध्येच आपली अधिक शक्ती खर्च होत असल्याचे प्रतिपादन आ़डी़पी़सावंत यांनी केले़पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आ़ सावंत बोलत होते़ ते म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्यायच होत आला आहे़ डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवून जायकवाडी, विष्णूपुरी धरण बांधले़ परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी जायकवाडीच्या वरच्या भागात धरणे बांधून घेतली़ त्यामुळे ते मराठवाड्याला पाणी सोडत नाहीत़ त्यामुळे सरकार कुणाचेही असो सिंचन खात्याचा मंत्री मात्र मराठवाड्याच असणे गरजेचे आहे़ समुद्रात जाणारे पाणी गोदावरीत सोडण्याची योजना आहे़ परंतु, त्यातील ५० टीएमसी पाणी अगोदर जायकवाडीसाठी आरक्षित करा, असेही आ़ सावंत म्हणाले़ आ़ अमरनाथ राजूरकर म्हणाले, परिषदेला लढा उभारण्यासाठी पैशाची गरज लागणार आहे़न्यायालयील लढाईसाठी खूप पैसे लागतात़ त्यामुळे आमदार या नात्याने परिषदेसाठी एक लाख रुपये देणार असल्याचे ते म्हणाले़ माजी आ़ शंकर धोंडगे यांनी लोकप्रनिधींच्या पाठिंब्याच्या विषयाची खिल्ली उडविली़ कोणत्याही लढाईसाठी सहानुभूतीची गरज नसून प्रत्यक्ष मैदानावर उतरावे लागते़ मी लाख रुपये देवू शकत नसलो तरी, वेळ पडल्यास महिनाभर तुरुंगात मात्र राहू शकतो असे वक्तव्य केले़ त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता़ माजी आ़ डी़ आऱ देशमुख यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सभागृहात आजपर्यंत किती लोकप्रतिनिधींनी मराठवाड्याच्या प्रश्नांवर आवाज उठविला ? असा प्रश्न केला़ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी चालते़ परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचा अभ्यास किती आहे? असेही ते म्हणाले़ तर डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी पाणी हाच मुख्य प्रश्न घेवून समितीची स्थापना करण्यात येणार आहे़ त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठबळाची गरज असल्याचे सांगितले़लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यात मग्नरविवारी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. पाण्यासाठी नांदेड शहरासह जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रश्नावर या बैठकीत चिंतन होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यांच्या गडबडीतच होते. अनेकांनी बैठक अर्धवट सोडून कार्यक्रम असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या घाईमुळे संयोजकांनी ज्या हेतूने बैठक आयोजित केली होती तो हेतू निश्चितच पूर्ण झाला नसल्याची चर्चा होती.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई