शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेची होणार स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:34 IST

दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़

नांदेड : दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़ यामध्येच आपली अधिक शक्ती खर्च होत असल्याचे प्रतिपादन आ़डी़पी़सावंत यांनी केले़पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आ़ सावंत बोलत होते़ ते म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्यायच होत आला आहे़ डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवून जायकवाडी, विष्णूपुरी धरण बांधले़ परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी जायकवाडीच्या वरच्या भागात धरणे बांधून घेतली़ त्यामुळे ते मराठवाड्याला पाणी सोडत नाहीत़ त्यामुळे सरकार कुणाचेही असो सिंचन खात्याचा मंत्री मात्र मराठवाड्याच असणे गरजेचे आहे़ समुद्रात जाणारे पाणी गोदावरीत सोडण्याची योजना आहे़ परंतु, त्यातील ५० टीएमसी पाणी अगोदर जायकवाडीसाठी आरक्षित करा, असेही आ़ सावंत म्हणाले़ आ़ अमरनाथ राजूरकर म्हणाले, परिषदेला लढा उभारण्यासाठी पैशाची गरज लागणार आहे़न्यायालयील लढाईसाठी खूप पैसे लागतात़ त्यामुळे आमदार या नात्याने परिषदेसाठी एक लाख रुपये देणार असल्याचे ते म्हणाले़ माजी आ़ शंकर धोंडगे यांनी लोकप्रनिधींच्या पाठिंब्याच्या विषयाची खिल्ली उडविली़ कोणत्याही लढाईसाठी सहानुभूतीची गरज नसून प्रत्यक्ष मैदानावर उतरावे लागते़ मी लाख रुपये देवू शकत नसलो तरी, वेळ पडल्यास महिनाभर तुरुंगात मात्र राहू शकतो असे वक्तव्य केले़ त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता़ माजी आ़ डी़ आऱ देशमुख यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सभागृहात आजपर्यंत किती लोकप्रतिनिधींनी मराठवाड्याच्या प्रश्नांवर आवाज उठविला ? असा प्रश्न केला़ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी चालते़ परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचा अभ्यास किती आहे? असेही ते म्हणाले़ तर डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी पाणी हाच मुख्य प्रश्न घेवून समितीची स्थापना करण्यात येणार आहे़ त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठबळाची गरज असल्याचे सांगितले़लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यात मग्नरविवारी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. पाण्यासाठी नांदेड शहरासह जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रश्नावर या बैठकीत चिंतन होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यांच्या गडबडीतच होते. अनेकांनी बैठक अर्धवट सोडून कार्यक्रम असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या घाईमुळे संयोजकांनी ज्या हेतूने बैठक आयोजित केली होती तो हेतू निश्चितच पूर्ण झाला नसल्याची चर्चा होती.

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई