शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

उकळते दूध सांडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:52 AM

शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़

ठळक मुद्देस्त्री रुग्णालयातील घटना : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़सांगवी येथील प्रतीक वायवळ या दोन वर्षीय मुलाला सोमवारी अशक्तपणामुळे उपचारासाठी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू केंद्रात दाखल केले होते़ या ठिकाणी प्रतीकवर उपचार सुरु होते़ शुक्रवारी दुपारी प्रतीकची आई जेवणानंतर बेडवर बसलेली होती़ तर प्रतीक हा खाली खेळत होता़ त्याचवेळी परिचारिकेने मुलांना देण्यासाठी गरम दूध आणले़ दुधाचे पातेले एका टेबलावर ठेवले होते़ त्याचवेळी प्रतीकचा टेबलला पाय लागल्याने गरम दुधाचे पातेले त्याच्या अंगावर पडले़ त्यामुळे तो ६० टक्के भाजल्या गेल्या होता़ नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले़ परंतु या ठिकाणी शनिवारी त्याचा उपचारा- दरम्यान मृत्यू झाला़याप्रकरणात परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळेच प्रतीकचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ तसेच या प्रकरणात परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली होती़ या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़बी़पीक़दम यांनी चौकशी करुन दोषी आढळल्यास परिचारिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रतीकच्या कुटुंबियांना दिले़दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात छत कोसळून मातेसह चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला होता़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ही घटना घडली़ त्यामुळे श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़सोयीसुविधांबाबत नेहमीच होते ओरडडॉ़पुष्पा हंगरगेकर यांच्या काळात श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे काम उत्कृष्टपणे सुरु होते़ रुग्णालयाच्या कामकाजाची अनेकवेळा प्रशंसाही करण्यात आली होती़ परंतु त्या पदावरुन दूर होताच या रुग्णालयाला अवकळा आली़ या ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिकांची मनमानी वाढली़ अनेकवेळा दिवसा अन् रात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही़ कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत त्यांना थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो़ अनेक कर्मचारी तर नावालाच रुग्णालयात हजेरी लावून जातात़ त्यामुळे या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आता जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे़