शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:05 AM

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी ...

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर वानोळा परिसरातील मजुरांचे शहराकडे स्थलांतर, रोजगार मिळेना

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी रोहयोची कामे ठप्प आहेत. मजुरांच्या हाताला काम व कुटुंबाकडे चरितार्थ चालविण्यासाठी दाम उपलब्ध होत नसल्याने शहराकडे ग्रामिणांचे स्थलांतर वाढले आहे.वानोळा परिसरात खरिपात सर्वाधिक रोजगार शेतीमधून निर्माण होतो. तर रबी हंगामानंतर त्यांना रोजगार पुरविते, ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. शासनाने या रोजगार हमी योजनेला कायद्याचे स्वरूप दिले आहे.प्रत्येक हाताला काम व कामानुसार दाम हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे़१०० दिवस रोजगार पुरविण्याची हमी या योजनेत आहे. रोजगार न मिळाल्यास बेरोजगार भत्ता देण्याचे प्रावधानही आहे. परंतु, वानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी ही योजना मृगजळ ठरू पाहत आहे. रोजगार दिला जात नसताना एकाही बेरोजगाराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही, ही बाबही वास्तविकता दाखविणारी आहे. सन २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत. कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे. आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहे. आता निवडणूक संपली तरीही कामे सुरु होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे शहरी भागात स्थलांतर होत आहे.कुशल कामाचे वेतन थकीतवानोळा परिसरात रोहयो कुशल कामाचे दोन वर्षांपासून लाखोंचे वेतन थकीत असल्याने रोजगार हमी योजनेकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम जाणवत आहे. काही ग्रामपंचायतींनी कामाची मागणी करूनही प्रशासनाने कामे उपलब्ध करून दिली नाहीत, असा आरोपही ग्रा़पं़सदस्यांनी केला. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसेही लाभार्थ्यांच्या खात्यात न आल्याने साहित्य पुरवठादार चकरा मारत आहेत. रोहयो तांत्रिक पॅनेल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविली जाते, यामध्ये अंदाजपत्रके व प्रत्यक्ष काम सुरू करून मोजमाप व देयके बनविण्याच्या कामाचा समावेश आहे.रोजगार नसलेल्या मजुराला भत्ता मिळेनावानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी रोजगार हमी योजना मृगजळ ठरू पाहत आहे़ रोजगार दिला जात नसताना एकाही मजुराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही. २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत़ कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे़आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहेत़ मात्र आता निवडणूक संपली असतानाही रोहयोची कामे सुरु होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत़या पॅनलमधील काही अधिकारी दुसऱ्यांच्या नावे कंत्राट घेत ठेकेदारी करीत असल्याने त्यांचे रोहयोकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे. मजुरांनी हाताला काम मिळावे, अशी मागणी केली आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद