शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

एल्गार ! बोगस जात प्रमाणपत्राविरूद्ध आदिवासी समाजाचा नांदेडमध्ये भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 18:01 IST

बोगस आदिवासींना जात प्रमाणपत्र देण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी नांदेडमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देराज्यात बोगस आदिवासींनी अनेक योजनेचा फायदा घेतला आहे.सर्वोच्च न्यायालयात ६ जुलै २०१७ रोजी अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लागू करावा बोगस जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मोर्चात जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले.

नांदेड : बोगस आदिवासींना जात प्रमाणपत्र देण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी नांदेडमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात माजीमंत्री तथा माजी विधानसभा उपसभापती वसंतराव पुरके, शिवाजीराव मोघे, पद्माकर वळवी, माजी आ. भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती होती़ या मोर्चात जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने पारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले.

राज्यात बोगस आदिवासींनी अनेक योजनेचा फायदा घेतला आहे. बोगस आदिवासींना खैरात वाटप करुन सरकारने मुळ आदिवासीवर अन्याय केला असून हा अन्याय दुर करावा तसेच मुळ आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी नांदेड जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोचार्चे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. संतोष टारपे, माजी आ. भिमराव केराम, माजी आ. उत्तम इंगळे, राज्य आदिवासी कल्याण संघाचे माजी राज्याध्यक्ष दादाराव टारपे यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात ६ जुलै २०१७ रोजी अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय दिला होता. परंतु अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंध आदिवासी जमाती संदर्भात बदनामी करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत ३ आॅक्टोबर रोजी जात वैधतेच्या बाबत घेतलेला निर्णय अनुसुचित जमातीला लागू करण्यात येवू नये, नांदेड जिल्हा गॅझेटीयर १९६१ च्या जनगननेप्रमाणे नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू व महादेव कोळी या जमाती अस्तित्वात नसल्याने त्यांना दिलेले बोगस जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

यासोबतच विशेष तपासणी समितीचे काम समाधानकारक नसून विशेष तपासणी समितीने आपले कार्य चोखपणे करावेत, आंध, आदिवासी जमातीचा अवमान व अवहेलना करणा-याविरूद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हे नोंदवावेत या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आंध, गौंड, परधान, भिल्ल, नाईकडा, कोलाम, पारधी आदी मुळ आदिवासींनी मोर्चात सहभाग घेतला़ सुमारे ५० हजाराहुन अधिक मुळ आदिवासी बांधव या धडक मोर्चात सहभागी झाले होते.या मोचार्ची सुरुवात शहरातील नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मैदानापासून करण्यात आली. नवीन मोंढा, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात सखाराम वाकोडे, प्रा. किशन मिराशे, प्रा. किशन फोले, प्रा. डॉ. शेकोबा ढोले, दादाराव टारपे, डॉ. बळीराम बुरके, शेषेराव कोवे, प्रा. विजय खुपसे, डॉ. हणमंत रिठ्ठे, राम मिराशे, रत्नाकर बुरकुले आदींचा सहभाग होता.

दरम्यान,  या मोर्चानंतर निवेदन देण्यासाठी माजीमंत्री वसंतराव पुरके, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, आ़संतोष टारपे, माजी आ़ भीमराव केराम आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते़ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या शिष्टमंडळातील सदस्यांची पोलिसांनी अडवणूक केल्याचा आरोप मोर्चेक-यांनी केला़ त्यामुळे प्रशासनाला निवेदन न देताच मोर्चेकरी माघारी परतले.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र