शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

उस्माननगरात आढळले ईस्ट इंडिया कंपनीचे नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:41 AM

एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या रुपयाचे नाणे रौप्य धातूचे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/उस्माननगर : उस्माननगर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.उस्माननगर (ता. कंधार) शिवारात कापूस लागवड केलेले शेतकरी पावसाची उघडीप झाल्यामुळे वखरणी करण्यात गुंतले आहेत. अशोक गोविंदराव काळम या शेतकºयाच्या शेतात वखरताना एक नाणे आढळले. त्यामुळे शेतकºयाने त्या नाण्याकडे कुतुहलाने पाहत त्याला आपल्या हातात घेतले. या नाण्यावर एका बाजूला फारशी भाषेचा उल्लेख आहे. तसेच इंग्लंडचा राजा विलियम (चौथा) याची प्रतिमा आहे. योगायोग म्हणजे निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर हा निजामाचा चौथा राजा होता. त्याचा कालखंड १८२९ ते १८५७ असा आहे. त्यामुळे या काळात अनेक नाणी प्रचलित होती. हे अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले.निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर यांचे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. या राजाच्या काळात चंदूलाल राजा, राजाराम बक्ष व सालारजंग (पहिले) हे तीन दिवाण होते. सालारजंग (पहिले) यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पामर कंपनी, सावकार, ब्रिटिश सरकार यांच्याकडून कर्ज घेतल्यामुळे हे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन गेले. त्यामुळे राज्य निजामाचे आणि हुकूम ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा, असा कारभार या काळात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या तंत्राने निजाम (चौथा) याचा कारभार सुरु असल्या कारणाने हे चलन मोठ्या प्रमाणात या भागात वापरात होते.मराठवाडा निजाम राजवटीत असल्यामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले. हे चलन ईस्ट इंडिया कंपनीचे व इंग्लंडचा राजा मिलियन (चौथा) यांची प्रतिमा असलेले आहे, असे श्री शिवाजी कॉलेज कंधारचे डॉ. अनिल कठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

---मराठवाडा निजाम राजवटीत असल्याचे कारणमराठवाडा निजाम राजवटीत असल्याच्या कारणामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी