शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उस्माननगरात आढळले ईस्ट इंडिया कंपनीचे नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:42 IST

एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या रुपयाचे नाणे रौप्य धातूचे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/उस्माननगर : उस्माननगर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.उस्माननगर (ता. कंधार) शिवारात कापूस लागवड केलेले शेतकरी पावसाची उघडीप झाल्यामुळे वखरणी करण्यात गुंतले आहेत. अशोक गोविंदराव काळम या शेतकºयाच्या शेतात वखरताना एक नाणे आढळले. त्यामुळे शेतकºयाने त्या नाण्याकडे कुतुहलाने पाहत त्याला आपल्या हातात घेतले. या नाण्यावर एका बाजूला फारशी भाषेचा उल्लेख आहे. तसेच इंग्लंडचा राजा विलियम (चौथा) याची प्रतिमा आहे. योगायोग म्हणजे निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर हा निजामाचा चौथा राजा होता. त्याचा कालखंड १८२९ ते १८५७ असा आहे. त्यामुळे या काळात अनेक नाणी प्रचलित होती. हे अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले.निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर यांचे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. या राजाच्या काळात चंदूलाल राजा, राजाराम बक्ष व सालारजंग (पहिले) हे तीन दिवाण होते. सालारजंग (पहिले) यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पामर कंपनी, सावकार, ब्रिटिश सरकार यांच्याकडून कर्ज घेतल्यामुळे हे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन गेले. त्यामुळे राज्य निजामाचे आणि हुकूम ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा, असा कारभार या काळात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या तंत्राने निजाम (चौथा) याचा कारभार सुरु असल्या कारणाने हे चलन मोठ्या प्रमाणात या भागात वापरात होते.मराठवाडा निजाम राजवटीत असल्यामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले. हे चलन ईस्ट इंडिया कंपनीचे व इंग्लंडचा राजा मिलियन (चौथा) यांची प्रतिमा असलेले आहे, असे श्री शिवाजी कॉलेज कंधारचे डॉ. अनिल कठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

---मराठवाडा निजाम राजवटीत असल्याचे कारणमराठवाडा निजाम राजवटीत असल्याच्या कारणामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी