शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उस्माननगरात आढळले ईस्ट इंडिया कंपनीचे नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:42 IST

एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.

ठळक मुद्देअर्ध्या रुपयाचे नाणे रौप्य धातूचे

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/उस्माननगर : उस्माननगर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस पिकाची वखरणी करत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले. त्यामुळे निजाम आणि ईस्ट इंडिया काळातील इतिहास आणि चलन व्यवहार या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे या नाण्यावरुन मानले जात आहे.उस्माननगर (ता. कंधार) शिवारात कापूस लागवड केलेले शेतकरी पावसाची उघडीप झाल्यामुळे वखरणी करण्यात गुंतले आहेत. अशोक गोविंदराव काळम या शेतकºयाच्या शेतात वखरताना एक नाणे आढळले. त्यामुळे शेतकºयाने त्या नाण्याकडे कुतुहलाने पाहत त्याला आपल्या हातात घेतले. या नाण्यावर एका बाजूला फारशी भाषेचा उल्लेख आहे. तसेच इंग्लंडचा राजा विलियम (चौथा) याची प्रतिमा आहे. योगायोग म्हणजे निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर हा निजामाचा चौथा राजा होता. त्याचा कालखंड १८२९ ते १८५७ असा आहे. त्यामुळे या काळात अनेक नाणी प्रचलित होती. हे अर्ध्या रुपयाचे रौप्य धातूचे नाणे आढळले.निजाम मीर फरखुंदा अलीखान नासीर उदौल्ला बहाद्दूर यांचे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. या राजाच्या काळात चंदूलाल राजा, राजाराम बक्ष व सालारजंग (पहिले) हे तीन दिवाण होते. सालारजंग (पहिले) यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी पामर कंपनी, सावकार, ब्रिटिश सरकार यांच्याकडून कर्ज घेतल्यामुळे हे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन गेले. त्यामुळे राज्य निजामाचे आणि हुकूम ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा, असा कारभार या काळात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या तंत्राने निजाम (चौथा) याचा कारभार सुरु असल्या कारणाने हे चलन मोठ्या प्रमाणात या भागात वापरात होते.मराठवाडा निजाम राजवटीत असल्यामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले. हे चलन ईस्ट इंडिया कंपनीचे व इंग्लंडचा राजा मिलियन (चौथा) यांची प्रतिमा असलेले आहे, असे श्री शिवाजी कॉलेज कंधारचे डॉ. अनिल कठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

---मराठवाडा निजाम राजवटीत असल्याचे कारणमराठवाडा निजाम राजवटीत असल्याच्या कारणामुळे हे चलन इथे मिळाले असावे. ईस्ट इंडिया कंपनी १६०० मध्ये भारतात स्थापन झाली. परंतु, तिला महाराष्टÑात यायला १८१८ साल उजाडले. निजाम (चौथा) हा आर्थिक स्थितीने बेजार झाल्यामुळे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी जवळीकता साधून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निजाम राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळविले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी