शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:34 IST

आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

ठळक मुद्देगतवर्षी साडेदहा लाख शेतकऱ्यांचा समावेश

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप-२०१८ मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे़ सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आदी खरीप पिकांचा या योजनेत समावेश केला आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे़ परंतु, त्या तुलनेत शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़बँकेत पीकविमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै तर बिगरकर्जदार शेतकºयांना पीकविमा उतरवण्याची २४ जुलै अंतिम तारीख देण्यात आली आहे़मागील वर्षी १० लाखांहून अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ त्यापैकी ७ लाख ४३ हजार ५९५ शेतकºयांना ५४२ कोटी ७५ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे़ ऐन पेरणीच्या काळात पीकविमा मिळाल्याने बहुतांश शेतकºयांची पेरणी आनंदात झाली़यंदा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत़ जिल्ह्यातील ३०२ सेतू सुविधा केंद्रांपैकी जवळपास शंभरांवर केंद्र बंद आहेत़ तांत्रिक अडचणींमुळे सातबारा मिळत नसल्याने महा-बुलेट वेबसाईटवरून सातबारा काढून त्यावर सही, शिक्का देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी तलाठ्यांना दिल्या होत्या़ त्यातच पीकविमा भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अडथळ्यात भर पडली आहे़ तर काही वेळा पीकविमा भरल्यानंतर येणारी पावती कोरी येत आहे़ त्यामुळे पुन्हा पुन्हा माहिती भरून ती पाठवावी लागत आहे़नांदेड जिल्ह्यात यंदा पीकविमा योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत असून जवळपास ८० हजार शेतकºयांनी सोयाबीन, कापूस, उडीद आदी पिकांचा विमा काढला असून त्यापोटी साडेतीन कोटी रूपयांचा भरणा झाला आहे़मागील वर्षात १० लाख ४० हजार ६१७ शेतकºयांनी साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा काढला होता़ यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे़---कृषी विभागाने केले आवाहनशेतकºयांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवशी गर्दी करु नये़त्यामुळे शेतकºयांनी पीक पेºयाचे स्वयंघोषणापत्र, सातबारा, ७-अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे यांनी केले आहे़---अडचणी झाल्या दूरसातबारा मिळण्यासाठी सर्व्हरची अडचण निर्माण झाली होती़ परंतु, ती दूर करण्यात आली असून शेतकºयांना वेळेत सातबारा देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत़ तसेच महा-बुलेटवरून काढण्यात येणाºया सातबारावर सही, शिक्का देण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत़-अरूण डोंगरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी