शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:34 IST

आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

ठळक मुद्देगतवर्षी साडेदहा लाख शेतकऱ्यांचा समावेश

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप-२०१८ मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे़ सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आदी खरीप पिकांचा या योजनेत समावेश केला आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे़ परंतु, त्या तुलनेत शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़बँकेत पीकविमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै तर बिगरकर्जदार शेतकºयांना पीकविमा उतरवण्याची २४ जुलै अंतिम तारीख देण्यात आली आहे़मागील वर्षी १० लाखांहून अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ त्यापैकी ७ लाख ४३ हजार ५९५ शेतकºयांना ५४२ कोटी ७५ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे़ ऐन पेरणीच्या काळात पीकविमा मिळाल्याने बहुतांश शेतकºयांची पेरणी आनंदात झाली़यंदा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत़ जिल्ह्यातील ३०२ सेतू सुविधा केंद्रांपैकी जवळपास शंभरांवर केंद्र बंद आहेत़ तांत्रिक अडचणींमुळे सातबारा मिळत नसल्याने महा-बुलेट वेबसाईटवरून सातबारा काढून त्यावर सही, शिक्का देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी तलाठ्यांना दिल्या होत्या़ त्यातच पीकविमा भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अडथळ्यात भर पडली आहे़ तर काही वेळा पीकविमा भरल्यानंतर येणारी पावती कोरी येत आहे़ त्यामुळे पुन्हा पुन्हा माहिती भरून ती पाठवावी लागत आहे़नांदेड जिल्ह्यात यंदा पीकविमा योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत असून जवळपास ८० हजार शेतकºयांनी सोयाबीन, कापूस, उडीद आदी पिकांचा विमा काढला असून त्यापोटी साडेतीन कोटी रूपयांचा भरणा झाला आहे़मागील वर्षात १० लाख ४० हजार ६१७ शेतकºयांनी साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा काढला होता़ यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे़---कृषी विभागाने केले आवाहनशेतकºयांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवशी गर्दी करु नये़त्यामुळे शेतकºयांनी पीक पेºयाचे स्वयंघोषणापत्र, सातबारा, ७-अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे यांनी केले आहे़---अडचणी झाल्या दूरसातबारा मिळण्यासाठी सर्व्हरची अडचण निर्माण झाली होती़ परंतु, ती दूर करण्यात आली असून शेतकºयांना वेळेत सातबारा देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत़ तसेच महा-बुलेटवरून काढण्यात येणाºया सातबारावर सही, शिक्का देण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत़-अरूण डोंगरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी