शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

विष्णूपुरीच्या जलवाहिनी गळतीमुळे नांदेड शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:35 IST

शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्दे जलवाहिनीतून मात्र दररोज लाखो लिटरची नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़विष्णूपुरी प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा असल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट आले होते़ त्यामुळे महापालिकेने शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु उपलब्ध साठा अपुरा असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडसाठी सोडले होते़ त्यातील १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले़ त्यामुळे नांदेडकरांचा उन्हाळ्याच्या पाणीप्रश्न मिटल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला़ परंतु उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़ त्यासाठी पाण्याची होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे़ परंतु नेमके त्याकडेच दुर्लक्ष केले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाºया जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे़ प्रकल्पापासून जवळपासे पावणेचार किमीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ अनेकांनी जलवाहिनीला छिद्रे पाडून पाण्याची चोरीही सुरु केली आहे़ दिवसरात्र या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ अशाचप्रकारे पाण्याची नासाडी होत राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा लवकरच संपणार अशी चिन्हे आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या भूजलपातळीत तब्बल तीन मीटरने घट झाल्याचा अहवाल आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़जलजागृती सप्ताहातचपाण्याचा अपव्ययएकीकडे प्रशासनाकडून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी, पाणी बचतीचे उपाय तसेच जनतेत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळेच लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, याचे मात्र सामान्य नागरिकांना नवल वाटत आहे.

टॅग्स :Waterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरण