शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

विष्णूपुरीच्या जलवाहिनी गळतीमुळे नांदेड शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:35 IST

शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्दे जलवाहिनीतून मात्र दररोज लाखो लिटरची नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़विष्णूपुरी प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा असल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट आले होते़ त्यामुळे महापालिकेने शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु उपलब्ध साठा अपुरा असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडसाठी सोडले होते़ त्यातील १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले़ त्यामुळे नांदेडकरांचा उन्हाळ्याच्या पाणीप्रश्न मिटल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला़ परंतु उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़ त्यासाठी पाण्याची होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे़ परंतु नेमके त्याकडेच दुर्लक्ष केले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाºया जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे़ प्रकल्पापासून जवळपासे पावणेचार किमीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ अनेकांनी जलवाहिनीला छिद्रे पाडून पाण्याची चोरीही सुरु केली आहे़ दिवसरात्र या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ अशाचप्रकारे पाण्याची नासाडी होत राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा लवकरच संपणार अशी चिन्हे आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या भूजलपातळीत तब्बल तीन मीटरने घट झाल्याचा अहवाल आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़जलजागृती सप्ताहातचपाण्याचा अपव्ययएकीकडे प्रशासनाकडून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी, पाणी बचतीचे उपाय तसेच जनतेत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळेच लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, याचे मात्र सामान्य नागरिकांना नवल वाटत आहे.

टॅग्स :Waterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरण