शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

विष्णूपुरीच्या जलवाहिनी गळतीमुळे नांदेड शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:35 IST

शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्दे जलवाहिनीतून मात्र दररोज लाखो लिटरची नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़विष्णूपुरी प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा असल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट आले होते़ त्यामुळे महापालिकेने शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु उपलब्ध साठा अपुरा असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडसाठी सोडले होते़ त्यातील १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले़ त्यामुळे नांदेडकरांचा उन्हाळ्याच्या पाणीप्रश्न मिटल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला़ परंतु उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़ त्यासाठी पाण्याची होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे़ परंतु नेमके त्याकडेच दुर्लक्ष केले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाºया जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे़ प्रकल्पापासून जवळपासे पावणेचार किमीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ अनेकांनी जलवाहिनीला छिद्रे पाडून पाण्याची चोरीही सुरु केली आहे़ दिवसरात्र या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ अशाचप्रकारे पाण्याची नासाडी होत राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा लवकरच संपणार अशी चिन्हे आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या भूजलपातळीत तब्बल तीन मीटरने घट झाल्याचा अहवाल आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़जलजागृती सप्ताहातचपाण्याचा अपव्ययएकीकडे प्रशासनाकडून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी, पाणी बचतीचे उपाय तसेच जनतेत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळेच लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, याचे मात्र सामान्य नागरिकांना नवल वाटत आहे.

टॅग्स :Waterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरण