शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पाणीटंचाईमुळे पशूपालकांची चाऱ्यासाठी वणवण; कडब्याच्या पेंडीला २० रुपयांचा भाव

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 26, 2024 19:31 IST

हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

नांदेड :  जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याच्या टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना दुसरीकडे  जनावरांसाठी लागणारा सुका चाराही महागला आहे. दहा रुपयाला मिळणाऱ्या कडब्याच्या पेंडीचा भाव २० रुपयावर गेल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात यंदा ज्वारीची लागवड बऱ्यापैकी असली तरी कडब्याचा सुका चारा मात्र कमी होणार आहे. हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दुभत्या जनावरांना सांभाळणे पशुपालकांसाठी अत्यंत कठीण होत आहे. उत्पादन खर्च आणि होणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्याकारणाने पशुपालक आता जनावरे बाजाराकडे घेऊन जात आहेत. भाकड जनावरे सांभाळणे तर दुभत्या जनावरांपेक्षाही अवघड आहे. होणारा खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात नेऊन विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करत आहे. 

जिल्ह्यातील हल्ली बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चारा महागल्यामुळे दुभती जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.  भाकड जनावरांची तर थेट विक्री करण्यात येत असल्याचे सध्या  बैल बाजारात हे चित्र पाहावयास मिळत आहे. कडबा बाजारात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पशुपालक फिरून कुठे स्वस्त चारा मिळतो का, याची देखील पाहणी करत आहेत.

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच चारा पिकांची लागवड खूप कमी प्रमाणात झाली असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. हिरव्या चाऱ्याची एक पेंडी २५ ते ३० रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी  दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागतो. या जनावरांकडून मिळणारे दूध आणि होणारा खर्च याचा मेळदेखील बसत नाही. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशुपालक अत्यंत अडचणीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यास हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार आहे. 

वैरणीसाठी मोजावे लागतात अधिकचे पैसेसध्या उस तोडणी बाकी असल्याने अणखी आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना चारा मिळेल. तसेच ज्या भागात पाण्याची व्यवस्था आहे, तेथील स्थिती बरी आहे. पण कोरडवाहू तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे अधिक जनावरे आहेत, त्यांच्याकडे जर चाऱ्याची सोय नसेल, तर अशा शेतकऱ्यांसमोर आता वैरण गोळा करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागण्याची वेळ येणार आहे. 

जनावरांची उपासमारसध्या उसाची तोडणी सुरू असल्याने हिरवा चारा आहे. पण काही दिवसांत तुटवडा जाणवेल. त्यासाठी सुका चारा घेणे आवश्यक आहे. मात्र, कडब्याचे भाव २० रुपये पेंडीवर पोहोचल्याने कडबा घेणे अतिशय खर्चिक आहे.-विश्वनाथ वाघ, शेतकरी पशुपालक पाथरड (रेल्वे)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी