शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

अत्यल्प पावसामुळे किनवट तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:22 IST

तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे़ ११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असल्याने व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेल्याने तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी चांगला पाऊस पडला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपाची पेरणी केली़ नंतर मात्र पावसाने उघडीप दिली़पुढे पुढे पावसाने दगाच दिला अन् हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेल्यात जमा आहे़ जून महिन्यात सतरा दिवस, जुलै महिन्यात वीस दिवस, आॅगस्ट महिन्यात चोवीस दिवस व सप्टेंबर महिन्यात केवळ आठ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जून महिन्यात सतरा दिवसांत दहावेळा एक अंकी व सातवेळा दोन अंकी, जुलै महिन्यात तेरावेळा एक अंकी व सातवेळा, आॅगस्ट महिन्यात एकोणवीस वेळा एक अंकी तर केवळ पाचवेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़ सप्टेंबर महिन्यात आठवेळा पाऊस पडला़ त्यात सातवेळा एक संकी तर एक वेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले़ प्रकल्प भरले मात्र बहुतांश प्रकल्प गाळात रुतलेले़ त्यामुळे जसजसे ऊन तापेल तसतसे नदी-नाले कोरडे पडतील़ प्रकल्प आटतील असेच चित्र राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे टाकणार आहे़ तर खरिपाचा उताराही घटणार असल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ शासनाने किनवट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे़ तशी मागणी आ़ प्रदीप नाईक यांनी लावून धरली. झालेला पाऊस याप्रमाणे - महिना झालेला पाऊस, पडावयाचा पाऊस या प्रमाणे जून १५१ (१७८), जुलै २२८ (३५७), आॅगस्ट ३६४ (३२२), सप्टेंबर ३६ (२२९) असा आहे़किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली.११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई