शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पावसामुळे किनवट तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:22 IST

तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे़ ११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असल्याने व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेल्याने तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी चांगला पाऊस पडला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपाची पेरणी केली़ नंतर मात्र पावसाने उघडीप दिली़पुढे पुढे पावसाने दगाच दिला अन् हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेल्यात जमा आहे़ जून महिन्यात सतरा दिवस, जुलै महिन्यात वीस दिवस, आॅगस्ट महिन्यात चोवीस दिवस व सप्टेंबर महिन्यात केवळ आठ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जून महिन्यात सतरा दिवसांत दहावेळा एक अंकी व सातवेळा दोन अंकी, जुलै महिन्यात तेरावेळा एक अंकी व सातवेळा, आॅगस्ट महिन्यात एकोणवीस वेळा एक अंकी तर केवळ पाचवेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़ सप्टेंबर महिन्यात आठवेळा पाऊस पडला़ त्यात सातवेळा एक संकी तर एक वेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले़ प्रकल्प भरले मात्र बहुतांश प्रकल्प गाळात रुतलेले़ त्यामुळे जसजसे ऊन तापेल तसतसे नदी-नाले कोरडे पडतील़ प्रकल्प आटतील असेच चित्र राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे टाकणार आहे़ तर खरिपाचा उताराही घटणार असल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ शासनाने किनवट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे़ तशी मागणी आ़ प्रदीप नाईक यांनी लावून धरली. झालेला पाऊस याप्रमाणे - महिना झालेला पाऊस, पडावयाचा पाऊस या प्रमाणे जून १५१ (१७८), जुलै २२८ (३५७), आॅगस्ट ३६४ (३२२), सप्टेंबर ३६ (२२९) असा आहे़किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली.११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई