शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पावसामुळे किनवट तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:22 IST

तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद आहे़ त्यामुळे किनवट तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे़ ११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडला असल्याने व पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेल्याने तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी चांगला पाऊस पडला़ त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपाची पेरणी केली़ नंतर मात्र पावसाने उघडीप दिली़पुढे पुढे पावसाने दगाच दिला अन् हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून गेल्यात जमा आहे़ जून महिन्यात सतरा दिवस, जुलै महिन्यात वीस दिवस, आॅगस्ट महिन्यात चोवीस दिवस व सप्टेंबर महिन्यात केवळ आठ दिवस पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ जून महिन्यात सतरा दिवसांत दहावेळा एक अंकी व सातवेळा दोन अंकी, जुलै महिन्यात तेरावेळा एक अंकी व सातवेळा, आॅगस्ट महिन्यात एकोणवीस वेळा एक अंकी तर केवळ पाचवेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़ सप्टेंबर महिन्यात आठवेळा पाऊस पडला़ त्यात सातवेळा एक संकी तर एक वेळा दोन अंकी पाऊस झाला आहे़झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले़ प्रकल्प भरले मात्र बहुतांश प्रकल्प गाळात रुतलेले़ त्यामुळे जसजसे ऊन तापेल तसतसे नदी-नाले कोरडे पडतील़ प्रकल्प आटतील असेच चित्र राहणार आहे़ त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे टाकणार आहे़ तर खरिपाचा उताराही घटणार असल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ शासनाने किनवट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे़ तशी मागणी आ़ प्रदीप नाईक यांनी लावून धरली. झालेला पाऊस याप्रमाणे - महिना झालेला पाऊस, पडावयाचा पाऊस या प्रमाणे जून १५१ (१७८), जुलै २२८ (३५७), आॅगस्ट ३६४ (३२२), सप्टेंबर ३६ (२२९) असा आहे़किनवट तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलिमीटर इतके असताना आजघडीला केवळ ८२१ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली.११८ दिवसांच्या पावसाळ्यात ६९ दिवसच पावसाची नोंद झाली़ त्यात दोनअंकी पाऊस वीस वेळा, एक अंकी पाऊस ४९ वेळा झाला आहे़ १६ आॅगस्ट रोजी तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाई