शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

देगलुरात दुष्काळावर शिक्कामोर्तब; पिकांची अंतिम आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:20 IST

तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे  दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने  शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे.  

देगलूर (नांदेड ) : तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे  दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने  शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे.  

तालुक्यात यावर्षी पाऊस  अवकाळी पावसासारखाच पडत राहिला. खरीप पिकाला तेही विशेष करून मूग, उडीद, सोयाबीन या नगदी पिकाला दर चार-पाच दिवसांत हलका स्वरूपाचा का होईना पाऊस लागतो. मात्र वारंवार पावसाने पाठ फिरविली. जेव्हा पावसाची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हा तर पावसाने अवकृपाच दाखवली. वेळ निघून गेल्यावर पाऊस पडला. परिणामी मूग व उडीद फक्त डाळीपुरते शेतक-यांच्या हाती लागले. सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक होता. सोयाबीनचा खर्च व त्यामानाने झालेले अत्यल्प उत्पादन व न परवडणारा भाव यामुळे सोयाबीनच्या राशी करणेसुद्धा महागात पडले होते.

देगलूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून कापसाची लागवड करणे म्हणजे शेतक-यांना कर्जदार होण्यासारखे झाले आहे. असे असतानासुद्धा नाईलाजास्तव शेतक-यांनी कापसाची लागवड केली. मात्र निकृष्ट दर्जाचे बियाणे, पावसाने मारलेली दडी, प्रतिकूल हवामान त्याचबरोबर कापसावर पडलेली बोंडअळी यामुळे एक - दोन वेचणीतच कापसाच्या पहाट्या शिल्लक राहिल्या. कापसाला लागणारी  भरमसाठ  लागवड व अनेक वर्षांपासून त्याच- त्या बियाणामुळे उत्पन्न नाममात्र व दरवर्षी कमी मिळणारा भाव या बाबींमुळे कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मागील चार वर्षांपासून तालुक्यात कोणत्या ना कोणत्या दुष्काळाला शेतक-यांना सामोरे जावे लागत आहे.  यावर्षी तूर तरी पिकेल असे वाटत असतानाच सतत ढगाळ वातावरणामुळे तुरीचेही उत्पन्न शेतक-यांच्या हाती लागणार नाही. एकंदरीत सर्वच पिके गेल्याने शेतकरी हताश झाला होता. 

मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांना विमा मिळणार ?तालुक्यातील मुगाची सरासरी अंतिम आणेवारी ४८़४५ टक्के, उडदाची ४८़६८ टक्के, सोयाबीनची ४६़४४ टक्के, कापसाची आणेवारी ३६़४९ टक्के, तुरीची ६१़६६ टक्के, आणि खरीप ज्वारीची ४५़४३ टक्के काढण्यात आली आहे. अंतिम आणेवारी ४८़३७ टक्के काढल्याने ज्यांनी मूग, उडीद, सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला होता त्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.महसूल प्रशासनाने नजर आणेवारी ५७़५५ टक्के तर सुधारित आणेवारी ५३़४७ टक्के काढल्याने शेतक-यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अंतिम आणेवारी तर वस्तुस्थितीला धरुन काढावी अशी शेतक-यांची मागणी होती. आ. सुभाष साबणे यांनीही महसूल प्रशासनाने ५० टक्क्यांच्या खाली आणेवारी काढावी अशी मागणी केली होती. तहसीलदार महादेव किरवले यांनीही अंतिम आणेवारी काढताना नेमकी वस्तुस्थिती पाहूनच आणेवारी ४८़३७ टक्के काढली आहे.