शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

देगलुरात दुष्काळावर शिक्कामोर्तब; पिकांची अंतिम आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 12:20 IST

तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे  दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने  शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे.  

देगलूर (नांदेड ) : तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी ४८.३७ टक्के काढण्यात आली. त्यामुळे  दुष्काळावर शिक्कामोतर्ब झाले आहे़ प्रशासनाने अंतिम आणेवारी वस्तुस्थितीला धरुन काढल्याने  शेतक-यांत समाधान व्यक्त केले जात आहे.  

तालुक्यात यावर्षी पाऊस  अवकाळी पावसासारखाच पडत राहिला. खरीप पिकाला तेही विशेष करून मूग, उडीद, सोयाबीन या नगदी पिकाला दर चार-पाच दिवसांत हलका स्वरूपाचा का होईना पाऊस लागतो. मात्र वारंवार पावसाने पाठ फिरविली. जेव्हा पावसाची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हा तर पावसाने अवकृपाच दाखवली. वेळ निघून गेल्यावर पाऊस पडला. परिणामी मूग व उडीद फक्त डाळीपुरते शेतक-यांच्या हाती लागले. सोयाबीनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक होता. सोयाबीनचा खर्च व त्यामानाने झालेले अत्यल्प उत्पादन व न परवडणारा भाव यामुळे सोयाबीनच्या राशी करणेसुद्धा महागात पडले होते.

देगलूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून कापसाची लागवड करणे म्हणजे शेतक-यांना कर्जदार होण्यासारखे झाले आहे. असे असतानासुद्धा नाईलाजास्तव शेतक-यांनी कापसाची लागवड केली. मात्र निकृष्ट दर्जाचे बियाणे, पावसाने मारलेली दडी, प्रतिकूल हवामान त्याचबरोबर कापसावर पडलेली बोंडअळी यामुळे एक - दोन वेचणीतच कापसाच्या पहाट्या शिल्लक राहिल्या. कापसाला लागणारी  भरमसाठ  लागवड व अनेक वर्षांपासून त्याच- त्या बियाणामुळे उत्पन्न नाममात्र व दरवर्षी कमी मिळणारा भाव या बाबींमुळे कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मागील चार वर्षांपासून तालुक्यात कोणत्या ना कोणत्या दुष्काळाला शेतक-यांना सामोरे जावे लागत आहे.  यावर्षी तूर तरी पिकेल असे वाटत असतानाच सतत ढगाळ वातावरणामुळे तुरीचेही उत्पन्न शेतक-यांच्या हाती लागणार नाही. एकंदरीत सर्वच पिके गेल्याने शेतकरी हताश झाला होता. 

मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांना विमा मिळणार ?तालुक्यातील मुगाची सरासरी अंतिम आणेवारी ४८़४५ टक्के, उडदाची ४८़६८ टक्के, सोयाबीनची ४६़४४ टक्के, कापसाची आणेवारी ३६़४९ टक्के, तुरीची ६१़६६ टक्के, आणि खरीप ज्वारीची ४५़४३ टक्के काढण्यात आली आहे. अंतिम आणेवारी ४८़३७ टक्के काढल्याने ज्यांनी मूग, उडीद, सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला होता त्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.महसूल प्रशासनाने नजर आणेवारी ५७़५५ टक्के तर सुधारित आणेवारी ५३़४७ टक्के काढल्याने शेतक-यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अंतिम आणेवारी तर वस्तुस्थितीला धरुन काढावी अशी शेतक-यांची मागणी होती. आ. सुभाष साबणे यांनीही महसूल प्रशासनाने ५० टक्क्यांच्या खाली आणेवारी काढावी अशी मागणी केली होती. तहसीलदार महादेव किरवले यांनीही अंतिम आणेवारी काढताना नेमकी वस्तुस्थिती पाहूनच आणेवारी ४८़३७ टक्के काढली आहे.