शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नांदेड जिल्ह्यात तीन तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:02 IST

खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे

ठळक मुद्देदेगलूर, मुखेड, उमरी तालुक्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे.जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ४० टक्के तर मुखेड तालुक्यात ५८ टक्के पाऊस झाला आहे. उमरी तालुक्यातही ८२ टक्के पाऊस झाला असला तरी तो वेळेवर न झाल्याने पिके हातची गेली आहेत. देगलूर तालुक्यात भीषण परिस्थिती असून मुखेडमध्येही पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागली.उपग्रह पाहणीच्या अहवालानुसार राज्यातील १७२ तालुक्यांतील टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी हे तीन तालुके समाविष्ट आहेत. या तीन तालुक्यांमध्ये पुढील आठ दिवसांत पुन्हा एकदा पाहणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह इतर तालुक्यांतही पाणी परिस्थिती बिकटच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नुकतीच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी घेतली. या बैठकीत त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.मुखेड, देगलूर आणि यासह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या कामांना प्रशासन लवकरच सुरूवात करणार आहे. त्याचवेळी शासन स्तरावरुन दुष्काळ कधी जाहीर होतो याकडेही लक्ष लागले आहे.परतीच्या पावसाने दिला दगासप्टेंबरमध्ये पाऊस थांबला. त्यानंतर तो येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होतो. यावर्षीही होईल, असे वाटले होते. मात्र यंदा परतीच्या पावसाने दगाच दिला आहे. पिकांना तर फटका बसलाच आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पुढे आला आहे. मुखेड तालुक्यात पाणी प्रश्न भीषण आहे. देगलूर तालुक्यातील पिकांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही देगलूर दौरा केला. यावेळी त्यांनी तात्काळ दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी