शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले समाजशास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.

ठळक मुद्देविद्यापीठात व्याख्यान राहुल कोसंबी यांचे प्रतिपादन

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले हे होते. तर कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती विश्लेषण’ या विषयावर बोलताना प्रा. कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी वेचले. भारताच्या विकासासाठी झटले. भारतातील जातीव्यवस्था हा विकासातला मोठा अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच, प्रत्यक्ष व्यवहारातून जात निघून जाण्यासाठी त्यांनी कार्य केले. जातीकडे त्यांनी कूट प्रश्न म्हणून पाहिले. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते जाती व्यवस्थेचे मूल्यांकन करु शकले. कारण जात ही आपसूकपणे आपली स्व:ची व्यवस्था निर्माण करत असते. असमानतेवर आधारित असलेली जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून त्यांनी मोठे कार्य केले.प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी तर डॉ. गजानन झोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. राम जाधव, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ.वीरा राठोड, डॉ योगिनी सातारकर, विश्वाधार देशमुख, उद्धव हंबर्डे, डॉ. भीमराव हटकर, सुनील ढाले, माधव जायभाये, संदीप एडके, विनायक येवले आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थी