शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जाती, धर्माच्या राजकारणाला थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:27 IST

भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता.

ठळक मुद्देनायगाव येथे अशोकराव चव्हाण यांचा आरोप दोन वर्षानंतरही कर्जमाफीची पूर्णपणे अंमलबजावणी नाही

नांदेड : भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता. दोन वर्षापासून कर्जमाफीची अंमलबजावणी केली जात असल्याची टीका खा. अशोकराव चव्हाण यांनी नायगाव येथे केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण यांनी नायगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले, ही लोकसभा निवडणूक धर्मनिरपेक्षतावादी विरुद्ध जातीयवादी अशीच होत आहे. मोदी सरकारने जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण केले. अनेक बळीही जातीयतेतून घेण्यात आले. त्याचवेळी साम, दाम, दंड, भेद नीतीचाही अवलंब करण्यात आल्याची टीका चव्हाण यांनी केली. भाजपाचे जुमलेबाज सरकार असल्याची टीका करताना १० कोटी नोकऱ्यांचे खोटे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले.नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपाने उमेदवार लादला आहे. या दलबदलू उमेदवाराला धडा शिकविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, संस्था बंद पाडणारे आज भाजपात मिरवत आहेत. स्वत: कारखाने बंद पाडून कारखाने आपण बंद पाडल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मुख्यमंत्री असताना शेतकरी व ठेवीदारांचे पैसे बुडू नये यासाठी जिल्हा बँकेला १०० कोटींची मदत केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.गावपातळीच्या कार्यकर्त्यांनी बाजार बुणग्यांची काळजी न करता आप-आपले बुथ सांभाळावे. आपण पाठीशी रहा, मी अख्खा महाराष्ट्र सांभाळतो, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. वसंत चव्हाण यांनीही विरोधकांनी जातीभेदाच्या वावड्या उठवल्या आहेत. ज्या पक्षात आपण काम करतो तीच आपली, खरी जात आहे. सोईरपण आणि जातीपेक्षा पक्ष मोठा आहे. दिलेला शब्द पाळणे हे नायगावकरांचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्ता आणि पद भोगणाऱ्यांनी गद्दारी केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना साथ देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस पक्ष एक मोठी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेत अनेकजण बसतात आणि अनेकजण उतरतात. उतरणाऱ्यांची दखल घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास माधवराव बेळगे, माजी जि.प. अध्यक्ष रावसाहेब मोरे, मोहन पाटील धुप्पेकर, विजय चव्हाण, संजय बेळगे, श्रीनिवास पाटील, आनंद चव्हाण, संभाजी भिलवंडे, मनोहर पवार, सय्यद रहीम, केशवराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, दत्ता पाटील होटाळकर, स. इसाक, संजय पाटील शेळगावकर, अनिल कांबळे, सुधाकर शिंदे, मिनाक्षी कागडे, बालाजी मिरकुटे, श्रीमती कमटेवाड, वंदना पवार, अनुसया मद्देवाड, सुरेखा भालेराव, भाई मांजरमकर, शिवाजी कागडे, रविंद्र भालेराव, इसाद नर्सीकर, जगदीश कदम, एस.एम. मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस