शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

जाती, धर्माच्या राजकारणाला थारा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:27 IST

भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता.

ठळक मुद्देनायगाव येथे अशोकराव चव्हाण यांचा आरोप दोन वर्षानंतरही कर्जमाफीची पूर्णपणे अंमलबजावणी नाही

नांदेड : भाजपा सरकार विकासाच्या ऐवजी जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. शेती मालाला हमीभाव न दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून पहिल्यांदाच भाजपा सरकारच्या काळात शेतकरी संपावर गेला होता. दोन वर्षापासून कर्जमाफीची अंमलबजावणी केली जात असल्याची टीका खा. अशोकराव चव्हाण यांनी नायगाव येथे केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण यांनी नायगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले, ही लोकसभा निवडणूक धर्मनिरपेक्षतावादी विरुद्ध जातीयवादी अशीच होत आहे. मोदी सरकारने जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण केले. अनेक बळीही जातीयतेतून घेण्यात आले. त्याचवेळी साम, दाम, दंड, भेद नीतीचाही अवलंब करण्यात आल्याची टीका चव्हाण यांनी केली. भाजपाचे जुमलेबाज सरकार असल्याची टीका करताना १० कोटी नोकऱ्यांचे खोटे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले.नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपाने उमेदवार लादला आहे. या दलबदलू उमेदवाराला धडा शिकविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, संस्था बंद पाडणारे आज भाजपात मिरवत आहेत. स्वत: कारखाने बंद पाडून कारखाने आपण बंद पाडल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मुख्यमंत्री असताना शेतकरी व ठेवीदारांचे पैसे बुडू नये यासाठी जिल्हा बँकेला १०० कोटींची मदत केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.गावपातळीच्या कार्यकर्त्यांनी बाजार बुणग्यांची काळजी न करता आप-आपले बुथ सांभाळावे. आपण पाठीशी रहा, मी अख्खा महाराष्ट्र सांभाळतो, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. वसंत चव्हाण यांनीही विरोधकांनी जातीभेदाच्या वावड्या उठवल्या आहेत. ज्या पक्षात आपण काम करतो तीच आपली, खरी जात आहे. सोईरपण आणि जातीपेक्षा पक्ष मोठा आहे. दिलेला शब्द पाळणे हे नायगावकरांचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्ता आणि पद भोगणाऱ्यांनी गद्दारी केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना साथ देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस पक्ष एक मोठी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेत अनेकजण बसतात आणि अनेकजण उतरतात. उतरणाऱ्यांची दखल घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास माधवराव बेळगे, माजी जि.प. अध्यक्ष रावसाहेब मोरे, मोहन पाटील धुप्पेकर, विजय चव्हाण, संजय बेळगे, श्रीनिवास पाटील, आनंद चव्हाण, संभाजी भिलवंडे, मनोहर पवार, सय्यद रहीम, केशवराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, दत्ता पाटील होटाळकर, स. इसाक, संजय पाटील शेळगावकर, अनिल कांबळे, सुधाकर शिंदे, मिनाक्षी कागडे, बालाजी मिरकुटे, श्रीमती कमटेवाड, वंदना पवार, अनुसया मद्देवाड, सुरेखा भालेराव, भाई मांजरमकर, शिवाजी कागडे, रविंद्र भालेराव, इसाद नर्सीकर, जगदीश कदम, एस.एम. मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस