शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आरक्षण धोरणात गोरबंजारा समाजाचा भेदभाव का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:51 IST

देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? असा प्रश्न महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केला.

ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा सवाल

भोकर : देशभरात गोरबंजारा समाजाची बोली भाषा, वेशभूषा, राहनीमान, रितीरिवाज एकसमान असले तरी समाजाचा आंध्र, कर्नाटक राज्यात अनुसूचित जमातत दर्जा आहे़ परंतु महाराष्ट्रात अनेक समाजाचा समावेश असलेल्या भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश करून आरक्षण धोरणात भेदभाव का? असा प्रश्न महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केला.गोरबंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवीगढ येथे ३ डिसेंबर रोजी नंगारा या वास्तूचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्ताने येथील संगम फंक्शन हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राज्य महसूलमंत्री संजय राठोड बोलत होते. यावेळी मंचावर गोरबंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजुसिंग नाईक, रोहिदास जाधव, केशवराव चव्हाण, डॉ. बी.डी. चव्हाण, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, आप्पाराव राठोड, डॉ. यु. एल. जाधव, विनोद चव्हाण, सुभाष किन्हाळकर, डॉ. राम नाईक यांची उपस्थिती होती.समाजाच्या विकासाकरिता असलेले वसंतराव नाईक महामंडळ बंद का ? असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या धोरणाबाबत राठोड यांनी नाराजी व्यक्त करुन पक्ष, राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नासाठी संघटीत झाले पाहिजे. यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष रोहिदास जाधव, डॉ. बी.डी. चव्हाण, शेषेराव चव्हाण यांनी विचार व्यक्त करुन पोहरादेवी येथे हजर होण्याचे आवाहन केले. सभेला विविध पक्षातील गोरबंजारा समाजातील पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती हे विशेष. प्रास्ताविक डॉ. यु.एल. जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. गणेश जाधव यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडreservationआरक्षणSanjay Rathodसंजय राठोड