शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

आरक्षणासाठी बलिदान देण्याची घाई करू नका - चिखलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:41 IST

नेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मावळ्यांनी बलिदान देण्याची घाई करू नये़ अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २ आॅगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आ. चिखलीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ आरक्षणाच्या मागणीला आपलाही पाठिंबा असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे़ नांदेड जिल्ह्यातही समाजाच्या भावनेचा उद्रेक झाला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी ३० वर्षापासून मराठा समाज संघर्ष करीत आहे़ प्रत्येकवेळी आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्षच केले़ 

शहानिशा करून गुन्हे नोंदवावी मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही तत्काळ मार्गी काढावा अशी आपली मागणी आहे़ मराठा समाजाच्या आंदोलनात काही विध्वंसक शक्ती शिरल्या असून निरपराध लोकांना त्याचा त्रास होत आहे़ आंदोलनाचे गुन्हे दाखल करताना शहानिशा करूनच प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली

आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, शासकीय मालमत्तेचे कोणीही नुकसान करू नये, आपला जीव गमावू नये, आणखी थोडेदिवस वाट पहा, हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असेही आज चिखलीकर म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील़ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचेही ते म्हणाले़ 

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत आरक्षणाच्या मागणीसाठी आपण राजीनामा देणार काय, या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले, विधान मंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे़ विधान मंडळातच सर्व प्रश्न सोडवता येतात़ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

श्रेयाच्या लढाईसाठी चढाओढमराठा आरक्षणाचा प्रश्न १९ जुलै रोजी विधान मंडळात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला़ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी या चर्चेत भाग घेतला होता़  त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात आरक्षणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली़ तसेच आणखी काही सूचना असतील तर सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते़ यावेळी विधान मंडळात एकाही सदस्याने मत मांडले नाही़ अधिवेशन संपल्यानंतर मात्र आंदोलन केले जात आहे़ श्रेयवादासाठी हे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले़ 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्री