शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

आरक्षणासाठी बलिदान देण्याची घाई करू नका - चिखलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:41 IST

नेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मावळ्यांनी बलिदान देण्याची घाई करू नये़ अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २ आॅगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आ. चिखलीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ आरक्षणाच्या मागणीला आपलाही पाठिंबा असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे़ नांदेड जिल्ह्यातही समाजाच्या भावनेचा उद्रेक झाला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी ३० वर्षापासून मराठा समाज संघर्ष करीत आहे़ प्रत्येकवेळी आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्षच केले़ 

शहानिशा करून गुन्हे नोंदवावी मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही तत्काळ मार्गी काढावा अशी आपली मागणी आहे़ मराठा समाजाच्या आंदोलनात काही विध्वंसक शक्ती शिरल्या असून निरपराध लोकांना त्याचा त्रास होत आहे़ आंदोलनाचे गुन्हे दाखल करताना शहानिशा करूनच प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली

आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, शासकीय मालमत्तेचे कोणीही नुकसान करू नये, आपला जीव गमावू नये, आणखी थोडेदिवस वाट पहा, हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असेही आज चिखलीकर म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील़ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचेही ते म्हणाले़ 

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत आरक्षणाच्या मागणीसाठी आपण राजीनामा देणार काय, या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले, विधान मंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे़ विधान मंडळातच सर्व प्रश्न सोडवता येतात़ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

श्रेयाच्या लढाईसाठी चढाओढमराठा आरक्षणाचा प्रश्न १९ जुलै रोजी विधान मंडळात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला़ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी या चर्चेत भाग घेतला होता़  त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात आरक्षणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली़ तसेच आणखी काही सूचना असतील तर सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते़ यावेळी विधान मंडळात एकाही सदस्याने मत मांडले नाही़ अधिवेशन संपल्यानंतर मात्र आंदोलन केले जात आहे़ श्रेयवादासाठी हे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले़ 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्री