शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

आयुष्याचा कॅनव्हॉस सोडून मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:57 IST

स्मार्ट फोनचा वापर काहीतरी नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. कमीत कमी दोन तास फोन बंद ठेवा

- विशाल सोनटक्के

आजकाल प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. चिमुकल्या मुलांना तर या स्मार्ट फोनची इतकी सवय झाली आहे की, मोबाईलशिवाय त्यांना करमतही नाही. मुलांतील ही बेचैनी धोकादायक आहे. समुपदेशक डॉ. श्रीकांत भोसीकर यांच्याशी साधलेला संवाद.

प्रत्येकाला आपल्या हातात कायम मोबाईल असावा, असे वाटते. मात्र याच सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात कितपत तथ्य आहे?स्मार्ट फोनने दाखवून दिले आहे की, मनुष्य किती वाहत जातो. आपण आपल्या आयुष्याचा भलामोठा कॅनव्हॉस सोडून पाच इंची स्क्रीनमध्ये अडकून पडलो आहोत.  सध्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अवघड झाले. त्यातून चिडचिडपणा निर्माण होऊन मानसिक ताण वाढत जातो. 

मनापासून प्रयत्न केल्यानंतर मोबाईलपासून दूर जाता येईल काय ?लग्न जोडणाऱ्या स्मार्ट फोनमुळे काहींचे संसार कायमचे तुटल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांपेक्षा स्मार्ट फोन काहींना जास्त जवळचा वाटू लागला आहे. सोशली फार कनेक्टेड असणारे प्रत्यक्षात खूपच एकटे असल्याचे दिसते.  आधी डेटा फ्री झाला आणि मग नाती सुद्धा. डेटा संपल्यानंतर रिचार्ज करता येईलही, परंतु नात्यांचे काय? त्यामुळे या संदर्भात ठोस पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. कोणतीही चांगली सवय लागायला प्रयत्न करावे लागतात आणि वेळही लागतो. 

स्मार्ट फोनचा वापर  कसा करायला हवा?स्मार्ट फोनचा वापर जाणीवपूर्वक करा. फोन कामासाठी हातात घेतला आहे, याचे भान ठेवले पाहिजे. काम संपल्यानंतर फोन दूर ठेवता आला पाहिजे. थोडावेळ जरी जास्त फोन हातात राहिला तर लगेचच इतर आॅनलाईन गोष्टीमध्ये आपण भरकटून जातो. मी पुन्हा सांगतो, स्मार्ट फोनचा वापर नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. आॅनलाईन न्यूज, न्यूजअ‍ॅपचा वापर थांबवा म्हणजे सतत ब्रेकींग न्यूजसाठी फोन घ्यावा लागणार नाही. त्यापेक्षा वर्तमानपत्र खरेदी करा,  कामाची व खरी माहिती मिळेल.

संभाव्य धोके टाळण्यासाठी हे करायलाच हवे प्रत्येकाने दिवसातला काहीकाळ आपला फोन बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. सुरुवात थोड्यापासून केली तरी चालेल. संध्याकाळी ठरावीक वेळेनंतरच फोन हातात घेण्याचे ठरवा. रात्री आठनंतर स्मार्ट फोनचा वापर फक्त कॉल करणे किंवा रिसीव्ह करण्यासाठी करा. सर्व नोटीफिकेशन, व्हायब्रेशन बंद करा. केवळ रिंगटोन चालू असावी म्हणजे तुमचे लक्ष प्रत्येकवेळी फोनकडे जाणार नाही. वापर नसलेले डाक्युमेंटस्, अ‍ॅपस् डिलीट करा. वॉकला जाताना फोन सोबत घेऊ नका. वेळ पाहण्यासाठी घडी वापरा. अलार्मसुद्धा  वेगळा असू द्या. 

ज्या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचे अंतर कमी झाले. त्याच तंत्रज्ञानाने आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीतील अंतर वाढविण्याचे काम केले आहे. आजच्या दैनंदिन धावपळीतील मिळणारा वेळही आपण मोबाईलमुळे कुटुंबाला देत नाही.  

टॅग्स :MobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाNandedनांदेड