शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

आयुष्याचा कॅनव्हॉस सोडून मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:57 IST

स्मार्ट फोनचा वापर काहीतरी नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. कमीत कमी दोन तास फोन बंद ठेवा

- विशाल सोनटक्के

आजकाल प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. चिमुकल्या मुलांना तर या स्मार्ट फोनची इतकी सवय झाली आहे की, मोबाईलशिवाय त्यांना करमतही नाही. मुलांतील ही बेचैनी धोकादायक आहे. समुपदेशक डॉ. श्रीकांत भोसीकर यांच्याशी साधलेला संवाद.

प्रत्येकाला आपल्या हातात कायम मोबाईल असावा, असे वाटते. मात्र याच सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात कितपत तथ्य आहे?स्मार्ट फोनने दाखवून दिले आहे की, मनुष्य किती वाहत जातो. आपण आपल्या आयुष्याचा भलामोठा कॅनव्हॉस सोडून पाच इंची स्क्रीनमध्ये अडकून पडलो आहोत.  सध्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अवघड झाले. त्यातून चिडचिडपणा निर्माण होऊन मानसिक ताण वाढत जातो. 

मनापासून प्रयत्न केल्यानंतर मोबाईलपासून दूर जाता येईल काय ?लग्न जोडणाऱ्या स्मार्ट फोनमुळे काहींचे संसार कायमचे तुटल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांपेक्षा स्मार्ट फोन काहींना जास्त जवळचा वाटू लागला आहे. सोशली फार कनेक्टेड असणारे प्रत्यक्षात खूपच एकटे असल्याचे दिसते.  आधी डेटा फ्री झाला आणि मग नाती सुद्धा. डेटा संपल्यानंतर रिचार्ज करता येईलही, परंतु नात्यांचे काय? त्यामुळे या संदर्भात ठोस पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. कोणतीही चांगली सवय लागायला प्रयत्न करावे लागतात आणि वेळही लागतो. 

स्मार्ट फोनचा वापर  कसा करायला हवा?स्मार्ट फोनचा वापर जाणीवपूर्वक करा. फोन कामासाठी हातात घेतला आहे, याचे भान ठेवले पाहिजे. काम संपल्यानंतर फोन दूर ठेवता आला पाहिजे. थोडावेळ जरी जास्त फोन हातात राहिला तर लगेचच इतर आॅनलाईन गोष्टीमध्ये आपण भरकटून जातो. मी पुन्हा सांगतो, स्मार्ट फोनचा वापर नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. आॅनलाईन न्यूज, न्यूजअ‍ॅपचा वापर थांबवा म्हणजे सतत ब्रेकींग न्यूजसाठी फोन घ्यावा लागणार नाही. त्यापेक्षा वर्तमानपत्र खरेदी करा,  कामाची व खरी माहिती मिळेल.

संभाव्य धोके टाळण्यासाठी हे करायलाच हवे प्रत्येकाने दिवसातला काहीकाळ आपला फोन बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. सुरुवात थोड्यापासून केली तरी चालेल. संध्याकाळी ठरावीक वेळेनंतरच फोन हातात घेण्याचे ठरवा. रात्री आठनंतर स्मार्ट फोनचा वापर फक्त कॉल करणे किंवा रिसीव्ह करण्यासाठी करा. सर्व नोटीफिकेशन, व्हायब्रेशन बंद करा. केवळ रिंगटोन चालू असावी म्हणजे तुमचे लक्ष प्रत्येकवेळी फोनकडे जाणार नाही. वापर नसलेले डाक्युमेंटस्, अ‍ॅपस् डिलीट करा. वॉकला जाताना फोन सोबत घेऊ नका. वेळ पाहण्यासाठी घडी वापरा. अलार्मसुद्धा  वेगळा असू द्या. 

ज्या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचे अंतर कमी झाले. त्याच तंत्रज्ञानाने आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीतील अंतर वाढविण्याचे काम केले आहे. आजच्या दैनंदिन धावपळीतील मिळणारा वेळही आपण मोबाईलमुळे कुटुंबाला देत नाही.  

टॅग्स :MobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाNandedनांदेड